Jio चा शानदार प्लान, एकदा रिचार्ज करा मिळवा ७३० जीबी डेटा

मुंबई: जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक रेंजमध्ये डेटा प्लान सादर करत असते. काहींना महिन्याभराची व्हॅलिडिटी असलेले प्लान हवे असतात तर काहीजण वर्षाच्या प्लानच्या शोधात असतात. यासाठी कंपनीही खास ऑफर देत असते. अशातच काही जण दर महिन्याला रिचार्ज करण्याऐवजी वर्षासाठीचे एकदाच रिचार्ज करत असतात. तुम्हीही अशा प्लानच्या शोधात आहात तर जिओ एक खास प्लान सादर करत आहे. जिओच्या अधिकृत पेजवरून कंपनीने ग्राहकांसाठी ३२२७ रूपयांचा खास प्लान आणला आहे.


जिओच्या ३२२७ रूपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. म्हणजेच तुम्ही एकदा रिचार्ज केल्यास वर्षभर बघायला नको. या प्लानमध्ये युजर्सला दिवसाला २ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच ३६५ दिवसांच्या हिशेबाने हा डेटा ७३० जीबी होईल.


खास बाब म्हणजे ग्राहकांना या प्लानमध्ये १ वर्षासाठी अॅमेझॉन प्राईम व्हिडिओचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. दरम्यान हे प्राईम व्हिडिओ मोबाईल एडिशन म्हणून दिले जात आहेत. याशिवाय जिओ सिनेमा, जिओ क्लाऊड, जिओ टीव्हीचा अॅक्सेसही मिळेल. या प्लानमध्ये ग्राहकांना फ्री कॉलिंगचीही सुविधा मिळत आहे.



हे प्लानही एक वर्ष चालतील


३२२७ रूपयांच्या प्लानशिवाय जिओेने वर्षभरासाठीचे आणखी प्लान्स सादर केले आहेत. यांचीही व्हॅलिडिटी ३६५ दिवसांची आहे. या प्लानची किंमत २९९९ रूपये आणि ३३३३ रूपये आहे. जिओच्या २९९९ रूपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दिवसाला २.५ जीबी डेटा दिला जातो. या प्लानची व्हॅलिडिटी १ वर्षे आहे. प्लानमध्ये फ्री कॉलिंगसोबत जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचाही अॅक्सेस देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत