Jio चा शानदार प्लान, एकदा रिचार्ज करा मिळवा ७३० जीबी डेटा

मुंबई: जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक रेंजमध्ये डेटा प्लान सादर करत असते. काहींना महिन्याभराची व्हॅलिडिटी असलेले प्लान हवे असतात तर काहीजण वर्षाच्या प्लानच्या शोधात असतात. यासाठी कंपनीही खास ऑफर देत असते. अशातच काही जण दर महिन्याला रिचार्ज करण्याऐवजी वर्षासाठीचे एकदाच रिचार्ज करत असतात. तुम्हीही अशा प्लानच्या शोधात आहात तर जिओ एक खास प्लान सादर करत आहे. जिओच्या अधिकृत पेजवरून कंपनीने ग्राहकांसाठी ३२२७ रूपयांचा खास प्लान आणला आहे.


जिओच्या ३२२७ रूपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. म्हणजेच तुम्ही एकदा रिचार्ज केल्यास वर्षभर बघायला नको. या प्लानमध्ये युजर्सला दिवसाला २ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच ३६५ दिवसांच्या हिशेबाने हा डेटा ७३० जीबी होईल.


खास बाब म्हणजे ग्राहकांना या प्लानमध्ये १ वर्षासाठी अॅमेझॉन प्राईम व्हिडिओचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. दरम्यान हे प्राईम व्हिडिओ मोबाईल एडिशन म्हणून दिले जात आहेत. याशिवाय जिओ सिनेमा, जिओ क्लाऊड, जिओ टीव्हीचा अॅक्सेसही मिळेल. या प्लानमध्ये ग्राहकांना फ्री कॉलिंगचीही सुविधा मिळत आहे.



हे प्लानही एक वर्ष चालतील


३२२७ रूपयांच्या प्लानशिवाय जिओेने वर्षभरासाठीचे आणखी प्लान्स सादर केले आहेत. यांचीही व्हॅलिडिटी ३६५ दिवसांची आहे. या प्लानची किंमत २९९९ रूपये आणि ३३३३ रूपये आहे. जिओच्या २९९९ रूपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दिवसाला २.५ जीबी डेटा दिला जातो. या प्लानची व्हॅलिडिटी १ वर्षे आहे. प्लानमध्ये फ्री कॉलिंगसोबत जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचाही अॅक्सेस देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, 'वंदे भारत'च्या फेऱ्या वाढल्या

मुंबई : कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईहून कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वंदे

जे.जे.हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या मुलांनी साकारला किल्ला

मुंबई : दिवाळीत किल्ला बनवण्यामागे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा आदर करणे, शौर्य आणि

काँग्रेसची भूमिका स्पष्ट : मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंशी युती नाकारली

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना, काँग्रेसने आपली भूमिका

दहा महिन्यांमध्ये गॅस सिलिंडर स्फोटांच्या ४७ दुघर्टना... एवढ्यांचे बळी, एवढे झाले जखमी

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईमध्ये सध्या आगीच्या दुघर्टनांमध्ये वाढत होत असून यामध्ये प्राधान्य क्रम हा सदोष

ओशिवरा नाल्यावरील पुलाचा खर्च वाढला, तब्बल ४० टक्क्यांनी अधिक वाढ

मुंबई (सचिन धानजी) : गोरेगाव (पश्चिम) एस व्ही रोडवरील ओशिवरा नाल्यावरील पुल पाडून नव्याने त्याची पुनर्बांधणी

दिवाळी पाडवा: जाणून घ्या महत्त्व आणि साजरा करण्याची पद्धत 

मुंबई: दिवाळी पाडवा किंवा बलिप्रतिपदा हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि उत्साहाचा दिवस आहे. दिवाळीच्या