Sushant Divgikar : सुशांत दिवगीकरच्या घरात लागली आग; अ‍ॅवॉर्ड्ससह काही महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक!

  101

कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान


मुंबई : ‘बिग बॉस’ रिअ‍ॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show) प्रसिद्धी मिळवलेला मॉडेल आणि गायक सुशांत दिवगीकरच्या (Sushant Divgikar) घरात शनिवारी रात्री आग लागली. सुशांतच्या मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरातील एसीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली. शनिवारी रात्री ११च्या सुमारास ही घटना घडली. काही क्षणांत आग पसरल्याने घरातील मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने सुशांत व त्याचे कुटुंबिय सुखरुप आहेत. आगीच्या घटनेने त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे.


सुशांत दिवगीकरच्या घरातील या स्फोटाबाबत त्याच्या मॅनेजरने माहिती दिली. त्याने सांगितले की, “घरातील हॉलमध्ये सगळे जण शनिवारी रात्री जेवण करत असताना एसीमध्ये स्फोट होऊन आग लागली. मग लगेचच ही आग स्वयंपाकघरात आणि ऑफिसमध्ये पसरली. या घटनेत अवॉर्ड्स, घरातील काही उपकरणं, फर्निचर आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जळाली आहेत. सुशांतचा मेकअप व त्याचे कपडेही या घटनेत जळाले आहेत,” असं मॅनेजरने सांगितलं.


“घरातील बरंच सामान जळालं आहे, सुशांतचं मोठं नुकसान झालं आहे पण सुदैवाने घरातील सर्व सदस्य सुखरुप आहेत. सुशांत सध्या त्याच्या आई-वडिलांच्या घरी राहतो. या घटनेनंतर त्याला मोठा धक्का बसला आहे, घराचे खूप मोठे नुकसान झाले आहे, मात्र कोणत्याही सदस्याला इजा झालेली नाही,” अशी माहिती सुशांतच्या मॅनेजरने दिली.


सुशांत हा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो त्याचे फोटो व रील्स इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. अभिनेत्याचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. सुशांत जुलै २०१४ मध्ये मिस्टर गे इंडियाचा विजेता ठरला होता. मग त्याने मिस्टर गे वर्ल्ड २०१४ मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. तसंच त्याच्या पुरुष व महिला अशा दोन्ही आवाजांतील गायकीसाठी तो प्रसिद्ध आहे. त्याने दोन आवाजात गायलेलं 'अप्सरा आली' हे मराठी गाणं चाहत्यांना विशेष आवडतं.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.