सेकंड हँड मोबाईल खरेदी करताय तर घ्या ही काळजी, नाहीतर होईल मोठे नुकसान

मुंबई: स्मार्टफोन्सच्या किंमती बऱ्याच वाढल्या आहेत. आधी जो रेडमी नोट सीरिजमधील फोन १० ते १५ हजार रूपयांना मिळत होता तोच स्मार्टफोन आता २० ते ३० हजारांवर पोहोचला आहे.


अशातच अनेक युजर्स सेकंड हँड स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करतात. जर तुम्हाला योग्य बजेटमध्ये चांगला फोन मिळत असेल तर हा पर्यायही चांगला ठरू शकतो. काही वेबसाईट अशा आहेत की ज्या सेकंड हँड फोन विकतात. असा फोन खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.


सगळ्यात फोनची फिजीकल कंडिशन चेक करा. तुम्ही स्क्रॅच, डेंट अथवा इतर गोष्टी पाहिल्या पाहिजेत. स्क्रीन क्रॅक आणि बटन्सवर लक्ष दिले पाहिजे. तसेच हा फोन किती जुना आहे हे ही पाहिले पाहिजे. कारण अनेक जुन्या फोन्सवर सॉफ्टवेअर अपडेट मिळत नाही. त्यामुळे नवीन अॅप्स त्यावर चालत नाहीत.


बॅटरीचे आरोग्य तपासणे अतिशय महत्त्वाचे आहे. तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन फोनच्या बॅटरीचे आरोग्य तपासू शकता. तसेच किती बॅकअप मिळतो हे ही तपासा. सेकंड हँड फोन खरेदी करताना हे लक्षात ठेवा की त्यावर लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेट्स मिळायला हवेत. जुन्या फोनमध्ये सिक्युरिटी डिव्हाईसबाबत त्रास होऊ शकतो.


याशिवाय IMEI नंबरही चेक केला पाहिजे. कारण यावरून समजते की तुम्ही जो फोन खरेदी करत आहात तो चोरीचा तर नाहीये ना? यासाठी ओरिजिनल बिलही मागवले पाहिजे.


याशिवाय फोनच्या स्टोरेजवरही लक्ष दिले पाहिजे. जर तुम्ही कमी स्टोरेजचा फोन खरेदी करत आहात तर त्यावर मर्यादित अॅप्स वापरू शकता.


तसेच फोनची किंमतही पाहणे तितकेच गरजेचे आहे. हे सगळ्यात गरजेचे आहे. तुम्ही फोनची मार्केट व्हॅल्यू चेक केली पाहिजे.

Comments
Add Comment

प्रारुप मतदार यादीबाबत १०,६६८ तक्रारींचे निवारण

कंट्रोल चार्टद्वारे मतदार यादीची केली जाते पडताळणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता