सेकंड हँड मोबाईल खरेदी करताय तर घ्या ही काळजी, नाहीतर होईल मोठे नुकसान

मुंबई: स्मार्टफोन्सच्या किंमती बऱ्याच वाढल्या आहेत. आधी जो रेडमी नोट सीरिजमधील फोन १० ते १५ हजार रूपयांना मिळत होता तोच स्मार्टफोन आता २० ते ३० हजारांवर पोहोचला आहे.


अशातच अनेक युजर्स सेकंड हँड स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करतात. जर तुम्हाला योग्य बजेटमध्ये चांगला फोन मिळत असेल तर हा पर्यायही चांगला ठरू शकतो. काही वेबसाईट अशा आहेत की ज्या सेकंड हँड फोन विकतात. असा फोन खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.


सगळ्यात फोनची फिजीकल कंडिशन चेक करा. तुम्ही स्क्रॅच, डेंट अथवा इतर गोष्टी पाहिल्या पाहिजेत. स्क्रीन क्रॅक आणि बटन्सवर लक्ष दिले पाहिजे. तसेच हा फोन किती जुना आहे हे ही पाहिले पाहिजे. कारण अनेक जुन्या फोन्सवर सॉफ्टवेअर अपडेट मिळत नाही. त्यामुळे नवीन अॅप्स त्यावर चालत नाहीत.


बॅटरीचे आरोग्य तपासणे अतिशय महत्त्वाचे आहे. तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन फोनच्या बॅटरीचे आरोग्य तपासू शकता. तसेच किती बॅकअप मिळतो हे ही तपासा. सेकंड हँड फोन खरेदी करताना हे लक्षात ठेवा की त्यावर लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेट्स मिळायला हवेत. जुन्या फोनमध्ये सिक्युरिटी डिव्हाईसबाबत त्रास होऊ शकतो.


याशिवाय IMEI नंबरही चेक केला पाहिजे. कारण यावरून समजते की तुम्ही जो फोन खरेदी करत आहात तो चोरीचा तर नाहीये ना? यासाठी ओरिजिनल बिलही मागवले पाहिजे.


याशिवाय फोनच्या स्टोरेजवरही लक्ष दिले पाहिजे. जर तुम्ही कमी स्टोरेजचा फोन खरेदी करत आहात तर त्यावर मर्यादित अॅप्स वापरू शकता.


तसेच फोनची किंमतही पाहणे तितकेच गरजेचे आहे. हे सगळ्यात गरजेचे आहे. तुम्ही फोनची मार्केट व्हॅल्यू चेक केली पाहिजे.

Comments
Add Comment

मुंबईत अर्धवट राहिलेल्या ४२५ रस्त्यांच्या कामांना सुरुवात, १५० कामे अद्याप थांबलेलीच

मुंंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटच्या अर्धवट कामांना आता

मुुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर धारावी प्रकल्पाचे होणार कास्टींग यार्ड?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावून जमिन पुनर्प्राप्त करून देण्याच्या

Rain Update : 'मोंथा' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 'मोंथा' (Montha)

दिवाळी हंगामात लालपरीची ३०१ कोटींची कमाई

चांगले उत्पन्न आणल्याबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांच्यांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक मुंबई

मोनोरेल, मेट्रो सेवांसाठीचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा...

जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षांच्या दिल्या अशा सूचना मुंबई (खास प्रतिनिधी) : सार्वजनिक वाहतूक

जागतिक तणावाच्या काळात भारत जगासाठी दीपस्तंभाची भूमिका बजावेल!

मुंबईत पंतप्रधान मोदींचे जागतिक सीईओ फोरममध्ये प्रतिपादन मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवारी)