बोलघेवड्या अनिल देशमुखांना जयंत पाटलांनी उताणी पाडले!

शरद पवार मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये सुनील तटकरे येऊन गेल्याचा केला होता अनिल देशमुखांनी खळबळजनक दावा


नाशिक : दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. याच दरम्यान शरद पवार मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) येऊन गेल्याचा खळबळजनक दावा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला होता. मात्र अनिल देशमुख यांचा हा दावा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी चक्क फेटाळून लावल्याने बोलघेवडे अनिल देशमुख सपशेल उताणी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


त्याचे झाले असे की, काल (दि. १६) मनमाड येथील सभा आटोपून शरद पवार आणि जयंत पाटील हे नाशिकच्या एका हॉटेलमध्ये मुक्कामासाठी दाखल झाले. यानंतर शरद पवार मुक्कामी असलेल्या हॉटेलला सुनील तटकरे यांनी भेट दिल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला होता. पुढे ते म्हणाले की, अजित पवार नाराज आहेत. तसेच चार जूननंतर महायुतीतील अनेक नेते नाराज असतील. मात्र जे पक्षाला सोडून गेले त्यांना परत घ्यायचे नाही हे पवार साहेबांनी सांगितले आहे, असे त्यांनी म्हटले.


ते पुढे म्हणाले की, हॉटेलला सुनील तटकरे येऊन गेले, असे मला कळले. माझी भेट झाली नाही. मात्र आमचे काही कार्यकर्ते त्यांना भेटले, असा दावा देखील त्यांनी केला. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.


परंतु, अनिल देशमुख यांचा हा दावा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र सपशेल फेटाळून लावला. जयंत पाटील यांनी सांगितले की, मी आणि शरद पवार एकाच हॉटेलला नाशिकमध्ये मुक्कामाला होतो. तिथे तटकरे यांची भेट झाली नसल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. यामुळे प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करणा-या अनिल देशमुखांचे पितळ त्यांच्याच वरिष्ठांकडून उघडे पडल्याने राजकीय वर्तुळात आता उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे