Cinema Hall Shut Down : दहा दिवस चित्रपटगृह राहणार बंद!

जाणून घ्या नेमकं काय आहे कारण


मुंबई : कलाविश्वाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. आज पासून पुढचे दहा दिवस चित्रपटगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय महाराष्ट्रात किंवा बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीने घेतलेला नसून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये (Tollywood Industry) घेण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी साऊथचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले. मात्र आता आणखी बड्या बड्या अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित होणार असताना सिनेमा हॉल (Cinema Hall) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



काय आहे कारण?


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये वर्षाच्या सुरुवातीपासूनच काही हिट चित्रपट प्रदर्शित झाले. ‘हनुमान’ आणि ‘टिल्लू स्क्वेअर’ या चित्रपटांनी तर तुफान कमाई केली आहे. पण हे सिनेमे सोडले तर इतर चित्रपटांनी फारशी कमाई केली नाही. आताचे गेले दोन ते तीन महिने तमिळ फिल्म इंडस्ट्रीसाठी फार काही चांगले गेले नाहीत. त्यामध्ये आता लोकसभा निवडणूक आणि आयपीएल चालू असल्याने त्याचाही फटका बसत आहे. कारण अनेक चांगले चित्रपट असतानाही प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तेलंगणामधील सिंगल स्क्रिन थिएटर्स मालकांनी दहा दिवस थिएटर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


दरम्यान, २५ मे रोजी काही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये ‘लव्ह मी’, ‘गँग्स ऑफ गोदावरी’, ‘हरोम हारा’ आणि ‘सत्यभामा’ या चित्रपटांचा समावेश आहे. मर्यादित बजेटमध्ये बनवलेले हे छोटे चित्रपट आहेत. मात्र चित्रपटगृहे बंद राहिली तर हे चित्रपट कुठे प्रदर्शित होणार असा प्रश्न डोकावत आहे.

Comments
Add Comment

दिल्लीसह चार राज्यांत सतर्कतेचा इशारा; २६ जानेवारीआधी सुरक्षायंत्रणा अलर्ट मोडवर

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्ली तसेच हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान

केरळच्या पर्यटकांवर अरुणाचलमध्ये काळाचा घाला; गोठलेल्या तलावात पडून एकाचा मृत्यू दुसऱ्याचा शोध सुरु

अरुणाचल प्रदेश : थंड हवेचा अनुभव घेण्यासाठी अरुणाचल प्रदेशात आलेल्या केरळमधील पर्यटकांच्या सहलीला दुर्दैवी

Hapur News : लग्न समारंभात राडा! हापूरमध्ये माशांच्या स्टॉलवर पाहुण्यांनी टाकला 'दरोडा, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

हापूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हापूर जिल्ह्यात एका विवाह सोहळ्यात आनंदाच्या वातावरणाऐवजी धक्कादायक आणि

Virat Ramayana Temple : जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगाची आज स्थापना! २१० टन वजन, ३३ फूट उंची; बिहारमधील 'विराट रामायण मंदिर' ठरणार आकर्षणाचे केंद्र

मोतिहारी : बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी येथे आज एक सुवर्णक्षण अनुभवायला मिळणार आहे. येथील विराट

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३