Cinema Hall Shut Down : दहा दिवस चित्रपटगृह राहणार बंद!

जाणून घ्या नेमकं काय आहे कारण


मुंबई : कलाविश्वाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. आज पासून पुढचे दहा दिवस चित्रपटगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय महाराष्ट्रात किंवा बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीने घेतलेला नसून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये (Tollywood Industry) घेण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी साऊथचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले. मात्र आता आणखी बड्या बड्या अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित होणार असताना सिनेमा हॉल (Cinema Hall) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



काय आहे कारण?


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये वर्षाच्या सुरुवातीपासूनच काही हिट चित्रपट प्रदर्शित झाले. ‘हनुमान’ आणि ‘टिल्लू स्क्वेअर’ या चित्रपटांनी तर तुफान कमाई केली आहे. पण हे सिनेमे सोडले तर इतर चित्रपटांनी फारशी कमाई केली नाही. आताचे गेले दोन ते तीन महिने तमिळ फिल्म इंडस्ट्रीसाठी फार काही चांगले गेले नाहीत. त्यामध्ये आता लोकसभा निवडणूक आणि आयपीएल चालू असल्याने त्याचाही फटका बसत आहे. कारण अनेक चांगले चित्रपट असतानाही प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तेलंगणामधील सिंगल स्क्रिन थिएटर्स मालकांनी दहा दिवस थिएटर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


दरम्यान, २५ मे रोजी काही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये ‘लव्ह मी’, ‘गँग्स ऑफ गोदावरी’, ‘हरोम हारा’ आणि ‘सत्यभामा’ या चित्रपटांचा समावेश आहे. मर्यादित बजेटमध्ये बनवलेले हे छोटे चित्रपट आहेत. मात्र चित्रपटगृहे बंद राहिली तर हे चित्रपट कुठे प्रदर्शित होणार असा प्रश्न डोकावत आहे.

Comments
Add Comment

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत