मुंबई : देशभरात निवडणुकीच्या रणधुमाळीत लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा रंग आणखी चढू लागला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्याची एकही संधी सोडत नाहीत. सध्या निवडणुकीचे पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान २० मे रोजी पार पडत आहे. यानंतर राजकीय वर्तुळाला ४ जूनच्या निकालाचे वेध लागली. मात्र, त्यापूर्वी भाजपाचे (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. ट्विटच्याआधारे मोहित कंबोज यांनी महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेचे उधाण आले आहे.
मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ४ जून रोजी लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आणखी एक फूट पडणार आहे. दोन्ही पक्षांमधून आमदार, नेते आणि कार्यकर्ते राजीनामा देऊन बाहेर पडतील. हे सर्वजण सध्या इतर पक्षांच्या संपर्कात आहेत, असा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे.
त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर खरोखरच ठाकरे गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गटातील उर्वरित आमदार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवारांची साथ सोडून सत्ताधारी गटात सामील होणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल, असे मोहित कंबोज यांनी सांगितले.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…