PM Narendra Modi : केरळने काँग्रेसला धडा शिकवला; यूपीमध्ये त्यांचं खातंही उघडणार नाही!

दिल्लीत भाजपाचे सरकार असणे हे उत्तर प्रदेशचं भाग्य


नरेंद्र मोदी यांचा राहुल गांधींवर घणाघात


लखनऊ : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्व राजकीय पक्षांची पाचव्या टप्प्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. बड्या बड्या नेत्यांनी देशभरात प्रचार सभांचा धडाका लावला आहे. तर सभेमध्ये अनेक पक्ष आपल्या विरोधकांवर हल्लाबोल करत आहेत. अशातच राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्यामुळे पंतप्रधानांनी राहुल गांधींना चांगलाच टोला लगावला आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेने आणि केरळने काँग्रेसला चांगलाच धडा शिकवला आहे. त्यामुळे यूपीमध्ये काँग्रेसचं खातंही उघडणार नाही अशी बोचरी टीका पंतप्रधानांनी केली.


एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी यांनी 'उत्तर प्रदेश नक्कीच आम्हाला भरपूर आशीर्वाद देईल आणि कोणतीही कमी राहू देणार नाही', असे म्हटले आहे. तर राहुल गांधी यांच्या रायबरेलीतून निवडणुकीबाबत, ''केरळने काँग्रेसला चांगलाच धडा शिकवला आहे, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही त्यांना चांगल ओळखलं आहे. वायनाडमधून पळून गेल्यानंतर आणि रायबरेलीला येण्याचा निर्णय घेण्यापूर्वी राहुल गांधी यांची भाषा आणि स्वर अतिशय धारदार केले आहेत आणि ते काहीही बोलत आहेत'', असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.



दिल्लीतील भाजपाचे सरकार हे उत्तर प्रदेशचं भाग्य


"उत्तर प्रदेशातील लोक अतिशय उदार स्वभावाचे लोक आहेत. ती जनता आता घराणेशाही स्वीकारू शकत नाही. योगीजींच्या नेतृत्वाखाली अनेक गोष्टी घडल्या, बदल झाला आणि त्याचा परिणाम झाला. लोकांना माहीत आहे की येथे भाजपाचे सरकार असणे, दिल्लीत भाजपाचे सरकार असणे हे उत्तर प्रदेशचं भाग्य आहे. माझं भाग्य आहे की, मला प्रत्येक राज्यात अशी टीम मिळाली आहे, मग ते सत्तेत असो किंवा विरोधात, मुख्यमंत्री असो वा मंत्री, ते तत्वांसाठी असतात. आमचं सौभाग्य आहे की आमच्याकडे अशी शेकडो आश्वासक माणसं आहेत" असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळ दौऱ्यावर, अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळच्या दौऱ्यावर असतील. हा दौरा

दिल्लीकर गुदमरले, मुंबईकरांचे काय?

दिवाळीनंतर दोन्ही महानगरांची हवा झाली विषारी फटाक्यांच्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरचा AQI ४०० पार, मुंबईचाही

दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचं देशवासियांना भावनिक पत्र

नवी दिल्ली : दिवाळीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना एक भावनिक पत्र लिहून शुभेच्छा दिल्या

१० कोटींच्या चिनी फटाक्यांची तस्करी : डीआरआयच्या ऑपरेशन फायर ट्रेलची मोठी कारवाई

नवी दिल्ली: भारताच्या सीमांवरून चिनी फटाक्यांची बेकायदेशीर आयात करण्याचा मोठा डाव महसूल गुप्तचर संचालनालयाने

नागा अतिरेक्यांवर ड्रोन स्ट्राईक ? भारतविरोधी पी. आंग माई ठार ?

नायपिदाव : भारत-म्यानमार सीमेवर बंडखोरांच्या हालचाली वाढू लागल्यामुळे तणावाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर २०

रेड कॉरिडॉर आता ग्रोथ कॉरिडॉर बनला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पोलिस स्मृतीदिनानिमित्त वक्तव्य

नवी दिल्ली: पोलीस स्मृतीदिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील पोलीस आणि सुरक्षा दलांच्या