Loksabha Election : पैसे द्या,मग मत देतो ; आंध्र प्रदेशात मतदारांची अजब मागणी

नवी दिल्ली : सध्या देशभरात चौथ्या टप्प्याचे मतदान उत्साह पाहायला मिळाले. परंतु, आंध्र प्रदेशमधील पलानाडूच्या सट्टानपल्ली प्रभागात मतदारांनी एक अजबच मागणी केल्याची बाब पुढे आली आहे. सट्टानपल्लीमधील १८व्या प्रभागात उमेदवाराने मतदारांना मतांच्या बदल्यात पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्ण न केल्याने तेथील मतदारांनी आंदोलन केले. आश्वासन देऊनही रक्कम न मिळाल्याने मतदारांकडून नाराजी व्यक्त होत आहे.


संपूर्ण राज्यामध्ये ही समस्या नवीन नाही. वेगवेगळ्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात मतांसाठी पैसे दिले जात असल्याचे समोर आले आहे. एक हजार ते ६ हजार रुपयांपर्यंत ही रक्कम असल्याचेदेखील सांगितले. राज्यात शनिवारी प्रचार संपला होता, नंतर तरीही अनेक ठिकाणी नोटा वाटप होत असल्याचा दावा केला जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, १८ प्रभागात एका उमेदवाराने पाच हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. पण काही महिलांना पैसे मिळाले नाहीत. पूर्व गोदावरी जिल्ह्यातील कोंडेवरम गावात लोकांनी निदर्शने केली. विजयवाडा येथील आमदार उमेदवाराने एका जवळच्या सहाय्यकाला नगरसेवक कार्यालयात पाठवले, जिथे मताच्या बदल्यात एक हजार रुपये दिले जात होते असे तेथील स्थानिक मतदाराने सांगितले.

Comments
Add Comment

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या