Loksabha Election : पैसे द्या,मग मत देतो ; आंध्र प्रदेशात मतदारांची अजब मागणी

नवी दिल्ली : सध्या देशभरात चौथ्या टप्प्याचे मतदान उत्साह पाहायला मिळाले. परंतु, आंध्र प्रदेशमधील पलानाडूच्या सट्टानपल्ली प्रभागात मतदारांनी एक अजबच मागणी केल्याची बाब पुढे आली आहे. सट्टानपल्लीमधील १८व्या प्रभागात उमेदवाराने मतदारांना मतांच्या बदल्यात पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्ण न केल्याने तेथील मतदारांनी आंदोलन केले. आश्वासन देऊनही रक्कम न मिळाल्याने मतदारांकडून नाराजी व्यक्त होत आहे.


संपूर्ण राज्यामध्ये ही समस्या नवीन नाही. वेगवेगळ्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात मतांसाठी पैसे दिले जात असल्याचे समोर आले आहे. एक हजार ते ६ हजार रुपयांपर्यंत ही रक्कम असल्याचेदेखील सांगितले. राज्यात शनिवारी प्रचार संपला होता, नंतर तरीही अनेक ठिकाणी नोटा वाटप होत असल्याचा दावा केला जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, १८ प्रभागात एका उमेदवाराने पाच हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. पण काही महिलांना पैसे मिळाले नाहीत. पूर्व गोदावरी जिल्ह्यातील कोंडेवरम गावात लोकांनी निदर्शने केली. विजयवाडा येथील आमदार उमेदवाराने एका जवळच्या सहाय्यकाला नगरसेवक कार्यालयात पाठवले, जिथे मताच्या बदल्यात एक हजार रुपये दिले जात होते असे तेथील स्थानिक मतदाराने सांगितले.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव