Loksabha Election : पैसे द्या,मग मत देतो ; आंध्र प्रदेशात मतदारांची अजब मागणी

नवी दिल्ली : सध्या देशभरात चौथ्या टप्प्याचे मतदान उत्साह पाहायला मिळाले. परंतु, आंध्र प्रदेशमधील पलानाडूच्या सट्टानपल्ली प्रभागात मतदारांनी एक अजबच मागणी केल्याची बाब पुढे आली आहे. सट्टानपल्लीमधील १८व्या प्रभागात उमेदवाराने मतदारांना मतांच्या बदल्यात पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्ण न केल्याने तेथील मतदारांनी आंदोलन केले. आश्वासन देऊनही रक्कम न मिळाल्याने मतदारांकडून नाराजी व्यक्त होत आहे.


संपूर्ण राज्यामध्ये ही समस्या नवीन नाही. वेगवेगळ्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात मतांसाठी पैसे दिले जात असल्याचे समोर आले आहे. एक हजार ते ६ हजार रुपयांपर्यंत ही रक्कम असल्याचेदेखील सांगितले. राज्यात शनिवारी प्रचार संपला होता, नंतर तरीही अनेक ठिकाणी नोटा वाटप होत असल्याचा दावा केला जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, १८ प्रभागात एका उमेदवाराने पाच हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. पण काही महिलांना पैसे मिळाले नाहीत. पूर्व गोदावरी जिल्ह्यातील कोंडेवरम गावात लोकांनी निदर्शने केली. विजयवाडा येथील आमदार उमेदवाराने एका जवळच्या सहाय्यकाला नगरसेवक कार्यालयात पाठवले, जिथे मताच्या बदल्यात एक हजार रुपये दिले जात होते असे तेथील स्थानिक मतदाराने सांगितले.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही