Nitesh Rane : आधी स्वतःच्या कपाळावरचा शिक्का पुसा!

आमदार नितेश राणे यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल


नालासोपारा : ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी काल एका जाहीर सभेत खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली होती. त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर "मेरा बाप गद्दार है," असं लिहिलंय, हे गद्दार आहेत, आणि ते गद्दारच राहतील, असे म्हटले होते. त्यावर आज भाजपाचे प्रवक्ते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी नालासोपारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या कपाळावर "मेरा बाप नपुंसक है", असा जो शिक्का लागला आहे, तो अगोदर पुसावा आणि नंतर दुसऱ्यांवर टीका करावी, असा जोरदार पलटवार केला.


भाजपचे आमदार नितेश राणे यांची पालघर लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज ते वसईच्या दौऱ्यावर आले होते. त्यानिमित्ताने भाजपतर्फे नालासोपारा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, साधूंची हत्या, श्रद्धा वालकर हत्याकांड इ. घटनांची पुनरावृत्ती नको असेल तर मोदी यांना सत्तेवर आणा. काँग्रेसला संधी दिली तर आपल्याला आपले सण देखील साजरे करता येणार नाहीत, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी