Nitesh Rane : आधी स्वतःच्या कपाळावरचा शिक्का पुसा!

आमदार नितेश राणे यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल


नालासोपारा : ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी काल एका जाहीर सभेत खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली होती. त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर "मेरा बाप गद्दार है," असं लिहिलंय, हे गद्दार आहेत, आणि ते गद्दारच राहतील, असे म्हटले होते. त्यावर आज भाजपाचे प्रवक्ते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी नालासोपारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या कपाळावर "मेरा बाप नपुंसक है", असा जो शिक्का लागला आहे, तो अगोदर पुसावा आणि नंतर दुसऱ्यांवर टीका करावी, असा जोरदार पलटवार केला.


भाजपचे आमदार नितेश राणे यांची पालघर लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज ते वसईच्या दौऱ्यावर आले होते. त्यानिमित्ताने भाजपतर्फे नालासोपारा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, साधूंची हत्या, श्रद्धा वालकर हत्याकांड इ. घटनांची पुनरावृत्ती नको असेल तर मोदी यांना सत्तेवर आणा. काँग्रेसला संधी दिली तर आपल्याला आपले सण देखील साजरे करता येणार नाहीत, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार