Blast: फटाका कंपनीत भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू ३ जखमी

शिवकाशी: तामिळनाडूच्या शिवकाशीमद्ये गुरूवारी एका फटाका कंपनीत(fireworks factory) भीषण स्फोट झाला. यात पाच महिलांसह ८ मजुरांचा मृत्यू झाला तर अन्य तीन जखमी झाले. ही घटना भारताचे फटाका केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवकाशीमध्ये घडली. येथील विरुधुनगर जिल्ह्यात शिवकाशीजवळ सेंगामालापट्टीस्थित एका खाजगी फटाका कंपनीत आग लागली.


पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. यात जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींमध्ये एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. आग लागण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.


मीडिया रिपोर्टनुसार हा स्फोट झाला तेव्हा फटाका कंपनीत १० कामगार होते. याआधी फेब्रुवारीमध्ये विरुधुनगर जिल्ह्यातील एका फटाका कंपनीत झालेल्या स्फोटात चार महिलांसह १० जणांचा मृत्यू झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दुर्घटनेत मृत व्यक्तींबाबत शोक व्यक्त केला होता.


दरम्यान, या घटनेप्रकरणी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी शोक व्यक्त केला असून जखमींना योग्य प्रकारचे उपचार पुरवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार ज्या सात रूममध्ये फटाके ठेवले होते ते पूर्णपणे जळून खाक झाले.

Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे