Rajasthan Accident : भीषण अपघात! भरधाव ट्रकच्या धडकेत एकाच घरातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

ट्रकचालक फरार; सीसीटीव्हीत कैद झाला थरार


जयपूर : राजस्थानमध्ये हायवेवर एक भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेवर ट्रक आणि कारची जोरदार धडक लागली असून या अपघातात एकाच घरातील ६ जण ठार झाले. राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील बनास नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाला.


हे कुटुंब सीकर जिल्ह्यातून रणथंबोरच्या त्रिनेत्र गणेश मंदिराकडे जाण्यासाठी निघालं होतं. हायवेवर कार मागून वेगाने येत असताना समोरुन जाणाऱ्या ट्रकने यु-टर्न घेतला. यानंतर कार थेट जाऊन ट्रकवर आदळली असल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.


दरम्यान, अपघातानंतर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. मात्र ट्रकचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. राजस्थानमध्ये झालेल्या या अपघातामुळे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि उपमुख्यमंत्री दिव्या कुमारी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.


"दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर सवाई माधोपूर जिल्ह्यातील बाउली पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या भीषण रस्ता अपघातात ६ नागरिकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. संबंधित अधिकाऱ्यांना पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत," अशी माहिती भजनलाल शर्मा यांनी एक्सवरुन दिली आहे.

Comments
Add Comment

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: "शिवाजी महाराजांचे धैर्य आजही प्रेरणा देते"; पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदर्शी नेते, कुशल प्रशासक, धोरणी

India AI Impact Summit 2026: मोठा दृष्टीकोन ठेवत एआयचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: देशाची नवीन पिढी वेगाने कृत्रिम बुद्धीमत्तेला म्हणजेच 'एआय'ला स्वीकारत असून ही अत्यंत अभिमानाची बाब

राष्ट्रपतींनी केली विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू ची पाहणी

नवी दिल्‍ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय फ्लीट

Amit Shah : गांधीनगरमध्ये घुमला शिवरायांचा जयघोष! गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगरमध्ये 'महाराष्ट्र समाज' तर्फे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी

Nations First Humanity Ai City : भारताची एआय झेप! बंगळुरूमध्ये साकारणार देशातील पहिली 'Humanity AI City', केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव काय म्हणाले ?

नवी दिल्ली : भारताला जागतिक 'एआय हब' बनवण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली असून, देशातील एआय इन्फ्रास्ट्रक्चर अधिक

Narendra Modi: पंतप्रधान मोदी आज अनेक देशांच्या राष्ट्रध्यक्षांना भेटणार; स्पेन, फिनलंड, सर्बियासह..

दिल्ली: नवी दिल्लीत सुरू असलेल्या एआय इम्पॅक्ट समिट दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी अनेक देशांच्या