Rajasthan Accident : भीषण अपघात! भरधाव ट्रकच्या धडकेत एकाच घरातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

  115

ट्रकचालक फरार; सीसीटीव्हीत कैद झाला थरार


जयपूर : राजस्थानमध्ये हायवेवर एक भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेवर ट्रक आणि कारची जोरदार धडक लागली असून या अपघातात एकाच घरातील ६ जण ठार झाले. राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील बनास नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाला.


हे कुटुंब सीकर जिल्ह्यातून रणथंबोरच्या त्रिनेत्र गणेश मंदिराकडे जाण्यासाठी निघालं होतं. हायवेवर कार मागून वेगाने येत असताना समोरुन जाणाऱ्या ट्रकने यु-टर्न घेतला. यानंतर कार थेट जाऊन ट्रकवर आदळली असल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.


दरम्यान, अपघातानंतर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. मात्र ट्रकचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. राजस्थानमध्ये झालेल्या या अपघातामुळे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि उपमुख्यमंत्री दिव्या कुमारी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.


"दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर सवाई माधोपूर जिल्ह्यातील बाउली पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या भीषण रस्ता अपघातात ६ नागरिकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. संबंधित अधिकाऱ्यांना पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत," अशी माहिती भजनलाल शर्मा यांनी एक्सवरुन दिली आहे.

Comments
Add Comment

गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर पहिल्यांदाच मोदी चीनच्या दौऱ्यावर! काय होणार चर्चा?

एससीओ शिखर परिषदेत पंतप्रधान होणार सहभागी नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या अखेरीस जपान आणि

Uttarkashi : धरालीतील 'कल्प केदार' मंदिराची दुर्दैवी पुनरावृत्ती; ८० वर्षांपूर्वी सापडले, आज पुन्हा गडप

धरालीचे प्राचीन शिवमंदिर ढगफुटीच्या तडाख्यात उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात

राहुल गांधींना सशर्त जामीन

चाईबासा : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना झारखंडमधील चाईबासा येथील विशेष खासदार-आमदार न्यायालयात

Uttarkashi : उत्तरकाशीत पूर आपत्तीची झळ अधिक तीव्र; पुराच्या तडाख्यात ६० बेपत्ता, मदतकार्यासाठी शर्यत सुरू

उत्तरकाशी : मंगळवारी उत्तराखंडमधील उत्तरकाशीत एक धक्कादायक घटना घडली. उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात

Eknath Shinde : शिंदेंची दौड पुन्हा दिल्लीत! शाह-मोदी भेटीत शिवसेनेच्या नाराजीचा हिशेब?

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे आठवड्याभरात दुसऱ्यांदा दिल्लीत दाखल

भारत, विंडीज-आफ्रिकेसोबत कसोटी मालिका खेळणार

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार सामने नवी दिल्ली : भारताने इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत