Dharashiv news : धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळच राजकीय वादातून एकाची हत्या!

दोन दिवसांपासून सुरु होता वाद


धाराशिव : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) धामधुमीत एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. मतदानाच्या (Voting) तिसर्‍या टप्प्यात ठिकठिकाणी मतदान होत असताना धाराशिवमध्ये (Dharashiv) राजकीय वादातून एका तरुणाची हत्या (Murder case) करण्यात आली आहे. मतदान केंद्राजवळच (Voting centre) चाकूने भोसकून केलेल्या हत्येमुळे धाराशिव परिसरात खळबळ उडाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाटसांगवी या ठिकाणी ही हत्येची घटना घडली आहे.


पाटसांगवी गावातील जिल्हा परिषदेच्या मतदान केंद्र परिसरात दोन गटांमध्ये मतदान केंद्रावर मतदार आणण्यावरून हा वाद झाला. त्यातून एका गटाने दुसऱ्या गटावर चाकू हल्ला केला. त्यात एकाचा मृत्यू झाला. समाधान पाटील असं मृत तरुणाचं नाव आहे. तर ज्याने चाकू हल्ला केला त्या आरोपीचं नाव गौरव अप्पा नाईकनवरे असं आहे. या हल्ल्यात इतर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


गेल्या काही दिवसांपासून दोन गटांमधील हा वाद चांगलाच धुमसत होता. आता मतदानाच्या दिवशी त्याचं निमित्त झालं आणि त्यातून ही हत्या झाली. सध्या तालुका रुग्णालयात समाधान पाटीलचा मृतदेह ठेवण्यात आला आहे तर चाकू हल्ला करणारा हल्लेखोर फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये