PM Modi : मोदींच्या सभेला गर्दी; लोखंडे आणि विखेंचा विजय निश्चित

अहमदनगर : शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) आणि नगरचे उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना मिळणारं प्रत्येक मत केंद्रात नरेंद्र मोदींना (Narendra Modi) अधिक मजबूत करेल. त्यामुळे नगरकरांनी अधिकाधिक मतदान करणे गरजेचे असून, याआधीच्या निवडणुकांचे सर्व रेकॉर्ड मोडून काढावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नगरकरांना केले. तुम्ही जर पोलिंग बूथ जिंकले तर मी अगदी सहजतेने सर्व लोकसभा जिंकेन, असा विश्वासही मोदींनी (PM Modi) व्यक्त केला.


नगरकरांमध्ये सर्व बूथ जिंकवून देण्याची ताकद असल्याचेही ते म्हणाले. ते अहमदनगर येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते. यावेळी मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.





नगरमधील सभेला संबोधित करण्यासाठी उभ्या राहिलेल्या मोदींनी नेहमीप्रमाणे त्यांच्या भाषणाची सुरूवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना कोटी कोटी अभिवादन करत मराठीतून केली. अहिल्यानगर भूमिला मी अभिवादन करतो, असे ते म्हणाले. देशाचा तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू असून, भाजप आणि मोदींविरोधात उभ्या ठाकलेल्या इंडी आघाडीची एक्सपायरी डेट ४ जून असल्याचेही मोदींनी सांगून टाकले.





यावेळी मोदी म्हणाले की, काँग्रेसने आपला जाहीरनामा पूर्णपणे मुस्लिम बनवला आहे. काँग्रेसकडे बोलण्यासाठी काहीच मुद्दे राहिलेले नसून, ५० वर्ष काँग्रेसने फक्त गरिबी हटवण्याचे खोटी आश्वासन दिल्याचे मोदी म्हणाले. तुमचं एक मत थेट मोदींच्या खात्यात जाणार आहे. त्यामुळे विचार करून मतदान करा, असे आवाहन मोदींनी मतदारांना केले. देशात आणखीन विकास होणार असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी आमचे सरकार अनेक योजना आणत असल्याचेही मोदी म्हणाले.





अहमदनगरमधून भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील विरूद्ध मविआचे निलेश लंके यांच्यात थेट लढत होत आहे. नुकतीच निलेश लंकेसाठी शरद पवारांनी प्रचार सभा घेतली होती. मात्र, त्या सभेच्या तुलनेत आजच्या मोदींच्या सभेला विराट जनसमुदाय उपस्थित होता. त्यामुळे सुजय विखेंच्या विरोधात मैदानात उतरलेल्या निलेश लंकेंच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. मोदींच्या सभेला झालेली गर्दी बघता लोखंडे आणि विखेंचा विजय निश्चित मानला जात आहे.




Comments
Add Comment

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना

Bacchu Kadu Farmers Andolan : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू कडू आज मुंबईत; संध्याकाळी ७ वाजता थेट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा!

७ वाजता महाबैठक! मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार मुंबई : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून

Weather Updates : समुद्र खवळणार, प्रशासनाची मोठी खबरदारी! हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा मोठा निर्णय

अरबी समुद्र (Arabian Sea) आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) झालेल्या हवामान बदलांमुळे (Weather Changes) महाराष्ट्राच्या

प्रतीक्षा संपली! नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नेरळ-माथेरान मिनी ट्रेन धावणार!

नेरळ : मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ-माथेरान दरम्यानची बहुप्रतिक्षित मिनी ट्रेन सेव