देशात तिसऱ्या टप्प्यात ६१ टक्के तर महाराष्ट्रात ५४.०९ टक्के मतदान

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. यामध्ये १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण ९३ मतदारसंघाचा समावेश होता. यात महाराष्ट्रातील ११ मतदारसंघ, गुजरातमधील २५, उत्तर प्रदेशातील १०, कर्नाटकातील १४, मध्य प्रदेशातील ९, छत्तीसगडमधील ७, बिहारमधील ५, आसाम ४, पश्चिम बंगालमधील ४, गोव्यातील २ आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील मतदारसंघांचा समावेश होता. यामध्ये सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजता मतदान संपले, तेव्हा देशभरात सुमारे ६१ टक्के मतदानाची नोंद झाली. तर महाराष्ट्रात या वेळेत ५४.०९ टक्के मतदान पार पडले.


यापैकी देशभरात सर्वाधिक मतदान ७५.०१ आसाममध्ये झाले तर सर्वात कमी मतदान ५४.०९ टक्के मतदान महाराष्ट्रात झाले.


दरम्यान, यामध्ये महाराष्ट्रातील बारामती, कोल्हापूर, सांगली या चर्चेतील लोकसभा मतदारसंघांसाठी मंगळवारी मतदान पार पडले. यांपैकी बारामतीत सर्वात कमी ४७.८४ टक्के, कोल्हापुरात ६३.७१ तर ५२.५६ टक्के मतदान झाले.


तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील मतदान




  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग - ५४.७५ टक्के

  • रायगड - ५०.३१ टक्के

  • लातूर - ५५.३८ टक्के

  • सांगली - ५२.५६ टक्के

  • बारामती - ४७.८४ टक्के

  • हातकणंगले - ६२.१८ टक्के

  • कोल्हापूर - ६३.७१ टक्के

  • माढा - ५०.०० टक्के

  • उस्मानाबाद - ५६.८४ टक्के

  • सातारा - ५४.७४ टक्के

  • सोलापूर - ४९.१७ टक्के

Comments
Add Comment

तुम्हाला 'या' ५ प्रकारे गॅस सिलेंडर बुक करता येणार; कोणता सर्वात सोपा पर्याय?, जाणून घ्या.

नवी दिल्ली: देशातील लाखो कुटुंबे स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलिंडर वापरतात. त्यामुळे प्रत्येक कुटुंबासाठी

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांच्या हत्येचा प्रयत्न

जम्मू : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी

Oil Crisis 2026: ३२ देशांचा महत्त्वपूर्ण निर्णय; तेल संकट दूर...

मुंबई: मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ही

बेंगळुरू विमानतळावर १.५७ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बेंगळुरू : बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर सीमाशुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय

वेदना कठीण मग मृत्यूची काय भीती ....अखेर ३३ वर्षीय हरीशला अखेर सर्वोच न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली : मृत्यूचे भय हे बहुतेक लोकांना असत, पण जेव्हा असहाय्य वेदना असतील तिथे मृत्यूही क्षुल्लक जाणवतो. असाच

Gas Shortage: 'गॅस'टंचाईवर सरकारची पावलं काय?, जाणून घ्या कुठे कुठे गॅसची कपात?

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा