T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपमध्ये एकत्र खेळणार भारत-पाकिस्तानचे खेळाडू

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) साठी आता चाहत्यांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. ही स्पर्धा जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिज या देशांमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र या स्पर्धेत असाही एक संघ उतरणार आहे यात भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू खेळताना दिसणार आहेत.


हा युगांडाचा संघ आहे. त्यांनी आपल्या संघाची घोषणा केली आहे. या १५ सदस्यीय संघात भारताचे ३ आणि पाकिस्तानचे २ खेळाडू आहेत. युगांडा संघाचे नेतृत्व ब्रायन मसाबा करणार आहेत.



युगांडाकडून खेळणार तीन भारतीय खेळाडू


हे तीनही खेळाडू रोनक पटेल, अल्पेश रमजानी आणि दिनेश नकरानी आहे. ३५ वर्षीय रोनक पटेलचा जन्म गुजरातच्या आणंद शहरात झाला होता. त्यांचे लहानपण तिथेच गेले. तर २९ वर्षीय अल्पेश रमजानीची कहाणी रौनक पटेलप्रमाणेच आहे. अल्पेशचा जन्मही मुंबईत झाला होता. त्यानंतर क्रिकेट करिअरसाठी युगांडाला गेला.


 


गुजरातच्या कच्छमध्ये जन्मलेला दिनेश नकरानी साधारण सात वर्षांपूर्वी युगांडाला आला होता. दिनेशने २०१४मध्ये सौराष्ट्रसाठी टी-२०मध्ये पदार्पण केले होते. याआधी त्याने अंडर १९ स्तरावरही गुजरातचे प्रतिनिधित्व केले होते. दुसरीकडे या संघात पाकिस्तानचे दोन खेळाडू रियाजत अली शाह आणि बिलाल हसन यांचा समावेश आहे. हे दोन्ही खेळाडू पाकिस्तानातून येऊन युगांडामध्ये राहिले.

Comments
Add Comment

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय