T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपमध्ये एकत्र खेळणार भारत-पाकिस्तानचे खेळाडू

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) साठी आता चाहत्यांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. ही स्पर्धा जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिज या देशांमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र या स्पर्धेत असाही एक संघ उतरणार आहे यात भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू खेळताना दिसणार आहेत.


हा युगांडाचा संघ आहे. त्यांनी आपल्या संघाची घोषणा केली आहे. या १५ सदस्यीय संघात भारताचे ३ आणि पाकिस्तानचे २ खेळाडू आहेत. युगांडा संघाचे नेतृत्व ब्रायन मसाबा करणार आहेत.



युगांडाकडून खेळणार तीन भारतीय खेळाडू


हे तीनही खेळाडू रोनक पटेल, अल्पेश रमजानी आणि दिनेश नकरानी आहे. ३५ वर्षीय रोनक पटेलचा जन्म गुजरातच्या आणंद शहरात झाला होता. त्यांचे लहानपण तिथेच गेले. तर २९ वर्षीय अल्पेश रमजानीची कहाणी रौनक पटेलप्रमाणेच आहे. अल्पेशचा जन्मही मुंबईत झाला होता. त्यानंतर क्रिकेट करिअरसाठी युगांडाला गेला.


 


गुजरातच्या कच्छमध्ये जन्मलेला दिनेश नकरानी साधारण सात वर्षांपूर्वी युगांडाला आला होता. दिनेशने २०१४मध्ये सौराष्ट्रसाठी टी-२०मध्ये पदार्पण केले होते. याआधी त्याने अंडर १९ स्तरावरही गुजरातचे प्रतिनिधित्व केले होते. दुसरीकडे या संघात पाकिस्तानचे दोन खेळाडू रियाजत अली शाह आणि बिलाल हसन यांचा समावेश आहे. हे दोन्ही खेळाडू पाकिस्तानातून येऊन युगांडामध्ये राहिले.

Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

भारत – ऑस्ट्रेलिया T20 थरार सुरू: पहिला सामना २९ ऑक्टोबरला!

Ind vs AUS T20 : दिवाळीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांच्या चाहत्यांचे लक्ष आता T20 क्रिकेटवर वळले आहे. २९ ऑक्टोबर

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.