T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपमध्ये एकत्र खेळणार भारत-पाकिस्तानचे खेळाडू

  44

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) साठी आता चाहत्यांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. ही स्पर्धा जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिज या देशांमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र या स्पर्धेत असाही एक संघ उतरणार आहे यात भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू खेळताना दिसणार आहेत.


हा युगांडाचा संघ आहे. त्यांनी आपल्या संघाची घोषणा केली आहे. या १५ सदस्यीय संघात भारताचे ३ आणि पाकिस्तानचे २ खेळाडू आहेत. युगांडा संघाचे नेतृत्व ब्रायन मसाबा करणार आहेत.



युगांडाकडून खेळणार तीन भारतीय खेळाडू


हे तीनही खेळाडू रोनक पटेल, अल्पेश रमजानी आणि दिनेश नकरानी आहे. ३५ वर्षीय रोनक पटेलचा जन्म गुजरातच्या आणंद शहरात झाला होता. त्यांचे लहानपण तिथेच गेले. तर २९ वर्षीय अल्पेश रमजानीची कहाणी रौनक पटेलप्रमाणेच आहे. अल्पेशचा जन्मही मुंबईत झाला होता. त्यानंतर क्रिकेट करिअरसाठी युगांडाला गेला.


 


गुजरातच्या कच्छमध्ये जन्मलेला दिनेश नकरानी साधारण सात वर्षांपूर्वी युगांडाला आला होता. दिनेशने २०१४मध्ये सौराष्ट्रसाठी टी-२०मध्ये पदार्पण केले होते. याआधी त्याने अंडर १९ स्तरावरही गुजरातचे प्रतिनिधित्व केले होते. दुसरीकडे या संघात पाकिस्तानचे दोन खेळाडू रियाजत अली शाह आणि बिलाल हसन यांचा समावेश आहे. हे दोन्ही खेळाडू पाकिस्तानातून येऊन युगांडामध्ये राहिले.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार