T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपमध्ये एकत्र खेळणार भारत-पाकिस्तानचे खेळाडू

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) साठी आता चाहत्यांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. ही स्पर्धा जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिज या देशांमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र या स्पर्धेत असाही एक संघ उतरणार आहे यात भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू खेळताना दिसणार आहेत.


हा युगांडाचा संघ आहे. त्यांनी आपल्या संघाची घोषणा केली आहे. या १५ सदस्यीय संघात भारताचे ३ आणि पाकिस्तानचे २ खेळाडू आहेत. युगांडा संघाचे नेतृत्व ब्रायन मसाबा करणार आहेत.



युगांडाकडून खेळणार तीन भारतीय खेळाडू


हे तीनही खेळाडू रोनक पटेल, अल्पेश रमजानी आणि दिनेश नकरानी आहे. ३५ वर्षीय रोनक पटेलचा जन्म गुजरातच्या आणंद शहरात झाला होता. त्यांचे लहानपण तिथेच गेले. तर २९ वर्षीय अल्पेश रमजानीची कहाणी रौनक पटेलप्रमाणेच आहे. अल्पेशचा जन्मही मुंबईत झाला होता. त्यानंतर क्रिकेट करिअरसाठी युगांडाला गेला.


 


गुजरातच्या कच्छमध्ये जन्मलेला दिनेश नकरानी साधारण सात वर्षांपूर्वी युगांडाला आला होता. दिनेशने २०१४मध्ये सौराष्ट्रसाठी टी-२०मध्ये पदार्पण केले होते. याआधी त्याने अंडर १९ स्तरावरही गुजरातचे प्रतिनिधित्व केले होते. दुसरीकडे या संघात पाकिस्तानचे दोन खेळाडू रियाजत अली शाह आणि बिलाल हसन यांचा समावेश आहे. हे दोन्ही खेळाडू पाकिस्तानातून येऊन युगांडामध्ये राहिले.

Comments
Add Comment

मुस्तफिजूर रहमानसाठी संपूर्ण बांगलादेश वेठीला!

आयपीएल प्रसारणावरील बंदीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये संताप नवी दिल्ली : बीसीसीआयने अलीकडेच आयपीएल फ्रँचायझी

आयसीसी टी-२० वर्ल्डकपचे नवीन वेळापत्रक?

भारतात खेळण्यास नकार देऊन बांगलादेशचा बीसीसीआयला दणका नवी दिल्ली : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ बांगलादेशमुळे

बीसीसीआयच्या आदेशामुळे KKR ने मुस्तफिजूरला सोडल, ९.२० बसणार फटका ?

मुंबई : आयपीएल २०२६ सुरू होण्याआधीच कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. बीसीसीआयच्या

वैभव सूर्यवंशीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रचला इतिहास

बेनोनी : दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील संघाविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या १९ वर्षांखालील

युवा भारताचा द. आफ्रिकेवर विजय

बेनोनी : पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीचा वापर करून लावण्यात आलेल्या निकालात, भारतीय १९

केकेआरच्या ताफ्यातून मुस्तफिझूर रहमानची एक्झिट

मुंबई : भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या वाढत्या राजकीय तणावाचा थेट परिणाम इंडियन प्रीमियर लीग २०२६ वर झाला आहे.