'या' तारखांना लागणार दहावी-बारावीचे निकाल...

CBSC: काही दिवसांपासुन दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत बनावट परिपत्रके समाजमाध्यमामध्ये व्हायरल होत आहेत. हा प्रकार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निदर्शनास आला. या पार्श्वभूमीवर मंडळाने निकालाच्या संभाव्य तारखेबाबतची माहिती अधिकृत संकेतस्थळाद्वारे जाहीर केली आहे. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल २० मेनंतर जाहीर केले जाऊ शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


देशभरातून तब्बल ३९ लाख विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या दहावी आणि बारावीची परीक्षा दिली आहे. त्यात बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी ते २ एप्रिल या कालावधीत, तर दहावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी ते १३ मार्च या दरम्यान घेण्यात आल्या. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांमध्ये निकालाची तारीख नमूद केलेली बनावट परिपत्रके फिरत असल्याने विद्यार्थी संभ्रमात होते. त्यामुळे समाजमाध्यमात फिरत असलेल्या निकालाच्या बनावट तारखांवर विश्वास न ठेवता अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन सीबीएसईकडून करण्यात आले होते.


या पार्श्वभूमीवर सीबीएसईने अधिकृत संकेतस्थळाद्वारे संदेश प्रसारित केला आहे. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल २० मेनंतर जाहीर केले जाऊ शकतात असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे बनावट तारखांमुळे संभ्रमात असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment

Dhurandhar 2 :धुरंधर २ ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी रोकॉर्डब्रेक कमाई

मुंबई : अभिनेता रणवीर सिंहचा 'धुरंधर: द रिव्हेंज' पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात उत्सुक असल्याचे पहायला मिळत

रुग्णाची हॉस्पिटलकडे एक मागणी आणि ....; आयटमाइज्ड बिल मागितले आणि धक्कादायक वास्तव समोर

नवी दिल्ली: वैद्यकीय उपचारांनंतर रुग्णालयाकडून येणारे बिल डोळे झाकून भरणाऱ्यांसाठी ही बातमी डोळे उघडणारी आहे.

चाहत्यांची प्रतीक्षा संपली, लवकरच रितेशचा 'हा' आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार

अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी सिनेमाची चाहते अनेक दिवसांपासून वाटत पाहत आहेत. मात्र, आता त्यांच्यासाठी खुशबर

बादशाहनंतर आता 'या' प्रसिद्ध गायकाला जीवे मारण्याची धमकी

नुकताच काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक बादशाहला बिष्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील