उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’

मनसे नेते अमेय खोपकरांची टीका


मुंबई : मुंबईतील राजकारणात महत्त्वाचे केंद्र असणाऱ्या शिवाजी पार्कवरील सभेवरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे आमने-सामने आले आहेत. १७ मे रोजी शिवतीर्थावर सभेसाठी मनसेने अर्ज केला आहे. तर ठाकरे गटाने निवडणूक जाहीर झाली तेव्हाच येथे सभा घेण्याची तयारी केली होती. यामुळे हे मैदान कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.


दरम्यान, शिवाजी पार्कवरील सभेवरून ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मनसेवर टीका केली होती. त्या टीकेला मनसेनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालेली आहे, अशी टीका मनसे नेते अमेय खोपकर यांनी केली आहे.


मागच्या सभेत राज ठाकरेंनी मी इतरांची पोरं कडेवर खेळवणार नाही, असे सांगितले होते. मात्र आता लोकसभेचा उमेदवार नसताना कुणाची पोरं कडेवर खेळवणार आहात? असा सवाल ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री अनिल परब यांनी विचारला होता.


त्याला आता मनसे नेते अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावरून उत्तर दिले आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या तालावर नाचकाम करणाऱ्या लोकांना शिवाजी पार्क मैदान सभेसाठी मिळत नसेल तर त्यामध्ये राजसाहेबांना आणायची काहीच गरज नाही. तुम्हाला नाचता येत नाही हे कबूल करा, अंगण वाकडे म्हणून उगाच भोकाड पसरू नका, असा टोला अमेय खोपकर यांनी लगावला आहे.

Comments
Add Comment

महाविकास आघाडीचे आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळले

मतदारयाद्या सदोष मुद्द्यांवर तपशीलवार खुलासा मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या

दादरमधील वाढत्या फटाक्यांच्या दुकानांना कुणाचे अभय? दुकानदारांसह नागरिकांचा जीव धोक्यात

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणा निमित्त केल्या जाणाऱ्या आतषबाजींकरता मुंबईतील काही प्रमुख दुकानांमध्ये

मालाड पूर्वेत भीषण आग! लाकडी गोदामात लागलेल्या आगीने घेतले रौद्ररूप: नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

मुंबई : मुंबईतील वर्दळीच्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या मालाड पूर्व भागात आज दुपारी भीषण आगीची घटना घडली.

महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण, आयुक्तांनी दिले असे आदेश..

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण व

ट्रेन तिकीट बुकिंगमध्ये तांत्रिक बिघाड, पेमेंट अडकले? रिफंडसाठी ‘ही’ पद्धत अवलंबा.

दिवाळीसाठी रेल्वेने गावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

फटाक्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ

मुंबई  : दिवाळीचा सण अगदीच एक-दोन दिवसांवर आला असताना यंदा देशभरातील बाजारात फटाक्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.