Sairat Movie : मराठी सिनेमाला सातासमुद्रापार नेणाऱ्या 'सैराट'ला आठ वर्षे पूर्ण!

रिंकूने शेअर केले आर्ची-परशाचे अनसीन फोटोज


मुंबई : मराठी सिनेसृष्टीत (Marathi cinema) दर्जेदार सिनेमांचा तुटवडा जाणवत असताना एक असा सिनेमा आला की ज्याने मराठी सिनेमांचं समीकरणच बदलून टाकलं. मराठी सिनेमाला सातासमुद्रापार नेणाऱ्या या सिनेमाने मराठीत आजवरची सर्वाधिक १०० कोटींची कमाई केली. तो म्हणजे नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित 'सैराट' सिनेमा (Sairat Movie). या सिनेमाने नावाप्रमाणेच प्रेक्षकांना सैराट करुन सोडलं. आजही कोणत्याही कार्यक्रमात 'झिंगाट' (Zingaat) गाण्यावर नाचल्याशिवाय लोकांचं मन भरत नाही, ही या सिनेमाची आणि अजय-अतुलच्या (Ajay-Atul) संगीताची जादू आहे.


'सैराट' सिनेमाला आज आठ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने या चित्रपटाची नायिका रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) म्हणजेच सगळ्यांची लाडकी आर्ची हिने आर्ची-परशाचे (Archi-Parshya) काही अनसीन फोटोज शेअर केले आहेत. पडद्यामागील रिंकू-आकाशची धमाल, घोडेस्वारी करतानाचा फोटो आणि तिचं पहिलं फोटोशूट या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "सैराटला आज ८ वर्ष पूर्ण झाली…" असं कॅप्शन रिंकूने या फोटोंना दिलं आहे. हे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांनी रिंकूच्या पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.





अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट करत सैराटचे तिचे गाजलेले संवाद पोस्ट केले आहेत. तर एकाने,"मराठी चित्रपट जगताला वरच्या टोकावर नेण्याचा आणि मराठीची ताकद जगाला दाखवण्याचा नागराज मंजुळेचा सर्वोत्तम प्रयत्न होता. अजय-अतुल यांनी आपल्या ज्ञानाने मराठी संगीत जगभर गाजवले. उमदा अभिनय परश्या आर्ची" असं म्हणत या सिनेमाचं कौतुक केलं तर एकाने सैराटचा दुसरा पार्ट काढण्याची मागणी केली आहे.


'सैराट' सिनेमा २९ एप्रिल २०१६ रोजी प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा पाहण्यासाठी लोक एक-दोनदा नव्हे तर तब्बल १७ वेळा सिनेमागृहात गेल्याचीही उदाहरणे आहेत. प्रेम, मैत्री आणि मजामस्ती दाखवत असतानाच एका महत्त्वाच्या सामाजिक विषयावर या चित्रपटाने भाष्य केलं होतं. समाजातील सत्य परिस्थिती दाखवण्यात नागराज मंजुळे यशस्वी झाला आणि म्हणूनच हा चित्रपट लोकांनाही प्रचंड आवडला. रिंकूने शेअर केलेल्या फोटोजच्या निमित्ताने आठ वर्षांपूर्वीचा रिंकूचा लूक आणि तिच्यात इतक्या वर्षांमध्ये झालेले बदल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ती आठवीत शिकत असताना तिने या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. तेव्हाचे रिंकू-आकाश आणि सिनेमाला यश मिळाल्यानंतर त्यांच्यात घडलेला बदल खरंच लक्ष वेधून घेणारा आहे.

Comments
Add Comment

मेट्रो-१ चा प्रवास घाट्याचा! उत्पन्न वाढीचा एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन तयार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील पहिली मेट्रो असलेली अंधेरी-घाटकोपर ही मेट्रो-१ मार्गिका घाट्यात चालत आहे. त्यातून

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,