Sairat Movie : मराठी सिनेमाला सातासमुद्रापार नेणाऱ्या 'सैराट'ला आठ वर्षे पूर्ण!

रिंकूने शेअर केले आर्ची-परशाचे अनसीन फोटोज


मुंबई : मराठी सिनेसृष्टीत (Marathi cinema) दर्जेदार सिनेमांचा तुटवडा जाणवत असताना एक असा सिनेमा आला की ज्याने मराठी सिनेमांचं समीकरणच बदलून टाकलं. मराठी सिनेमाला सातासमुद्रापार नेणाऱ्या या सिनेमाने मराठीत आजवरची सर्वाधिक १०० कोटींची कमाई केली. तो म्हणजे नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित 'सैराट' सिनेमा (Sairat Movie). या सिनेमाने नावाप्रमाणेच प्रेक्षकांना सैराट करुन सोडलं. आजही कोणत्याही कार्यक्रमात 'झिंगाट' (Zingaat) गाण्यावर नाचल्याशिवाय लोकांचं मन भरत नाही, ही या सिनेमाची आणि अजय-अतुलच्या (Ajay-Atul) संगीताची जादू आहे.


'सैराट' सिनेमाला आज आठ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने या चित्रपटाची नायिका रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) म्हणजेच सगळ्यांची लाडकी आर्ची हिने आर्ची-परशाचे (Archi-Parshya) काही अनसीन फोटोज शेअर केले आहेत. पडद्यामागील रिंकू-आकाशची धमाल, घोडेस्वारी करतानाचा फोटो आणि तिचं पहिलं फोटोशूट या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "सैराटला आज ८ वर्ष पूर्ण झाली…" असं कॅप्शन रिंकूने या फोटोंना दिलं आहे. हे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांनी रिंकूच्या पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.





अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट करत सैराटचे तिचे गाजलेले संवाद पोस्ट केले आहेत. तर एकाने,"मराठी चित्रपट जगताला वरच्या टोकावर नेण्याचा आणि मराठीची ताकद जगाला दाखवण्याचा नागराज मंजुळेचा सर्वोत्तम प्रयत्न होता. अजय-अतुल यांनी आपल्या ज्ञानाने मराठी संगीत जगभर गाजवले. उमदा अभिनय परश्या आर्ची" असं म्हणत या सिनेमाचं कौतुक केलं तर एकाने सैराटचा दुसरा पार्ट काढण्याची मागणी केली आहे.


'सैराट' सिनेमा २९ एप्रिल २०१६ रोजी प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा पाहण्यासाठी लोक एक-दोनदा नव्हे तर तब्बल १७ वेळा सिनेमागृहात गेल्याचीही उदाहरणे आहेत. प्रेम, मैत्री आणि मजामस्ती दाखवत असतानाच एका महत्त्वाच्या सामाजिक विषयावर या चित्रपटाने भाष्य केलं होतं. समाजातील सत्य परिस्थिती दाखवण्यात नागराज मंजुळे यशस्वी झाला आणि म्हणूनच हा चित्रपट लोकांनाही प्रचंड आवडला. रिंकूने शेअर केलेल्या फोटोजच्या निमित्ताने आठ वर्षांपूर्वीचा रिंकूचा लूक आणि तिच्यात इतक्या वर्षांमध्ये झालेले बदल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ती आठवीत शिकत असताना तिने या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. तेव्हाचे रिंकू-आकाश आणि सिनेमाला यश मिळाल्यानंतर त्यांच्यात घडलेला बदल खरंच लक्ष वेधून घेणारा आहे.

Comments
Add Comment

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे