Balayogi Maheshwarananda : मठामध्ये सेवेकरी महिलेचा खून केल्याचे बिंग फुटल्याने महंत फरार

कोल्हापूर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात नवरात्र उत्सवात छातीवर घटस्थापना करुन प्रसिद्धी मिळवलेल्या एका स्वयंघोषित महंताचा खरा चेहरा उघडकीस झाला आहे. कोल्हापूर येथील मठामध्ये सेवेकरी महिलेचा खून केल्याचे बिंग फुटल्याने हा ढोंगी बाबा सध्या फरार झाला आहे. बालयोगी महेश्वरानंद (Balayogi Maheshwarananda) असे या बाबाचे नाव आहे. महेश अर्जुन माने हे त्याचे मूळ नाव आहे.


गेल्यावर्षी नवरात्रोत्सव काळामध्ये या बाबाने तब्बल महिनाभर श्रीरामपूरमध्ये वास्तव्य देखील केले. विविध पक्षांचे नेते आणि लोकप्रतिनिधी या बाबाचे भक्त आहेत. मात्र या ढोंगी बाबाचा खरा चेहरा उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूरमध्येच राहणाऱ्या ३४ वर्षीय वैष्णवी लक्ष्मीकांत पवार या महाराजांच्या कोल्हापूर येथील मठामध्ये सेवेकरी होत्या. मयत वैष्णवीचा एका तरुणाशी विवाह जुळवण्यामध्ये या बाबाचा पुढाकार होता. मात्र लग्नापूर्वी वैष्णवी व तिच्या होणाऱ्या नवऱ्याने लिव्ह इन मध्ये राहण्याचा आग्रह धरला होता. त्याला वैष्णवीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. वैष्णवीने धरलेला हट्ट सोडावा यासाठी तिच्या कुटुंबीयांनी तिला महंताकडे नेले. मात्र तरीदेखील मुलीने नकार दिल्याने तिला मठामध्येच मारहाण करण्यात आली आणि यामध्येच तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सेवेकरी, आई व वडील यांनी महंतांच्या सांगण्यावरूनच मारहाण केल्याचा आरोप आहे.


या गुन्ह्याचा कसून तपास केल्यानंतर हा बाबाच या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी समोर आणले. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याचे समजताच हा ढोंगी बाबा तेथून पसार झाला आहे. विशेष म्हणजे जे लोकप्रतिनिधी तसेच पुढारी या बाबाच्या चरणी लीन झाले आता त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली आहे.


दरम्यान, या बाबाचे पन्हाळा तालुक्यातील देवठाणे येथे मठ आहे. त्याचाच भाऊ बालकृष्ण महाराज यांच्यासह तो स्वतः या मठाचे काम पाहतो.

Comments
Add Comment

'ई-चलान' वसुलीसाठी सक्ती केल्यास पोलिसांवरच होणार कारवाई; पोलीस महासंचालकांचे निर्देश

मुंबई : रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ‘ई-चलान’च्या दंडाची वसुली करताना

जळगावात मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष दाखवून...

जळगाव: जळगावमध्ये एका मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष देऊन अपघाताचं प्रकरण बनवलं आणि विम्याचे ५० लाख

सरकारने १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांसंदर्भातील दिली मोठी बातमी, काय सांगितलं?

नवी दिल्ली: देशातील चलनात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोखीचे

जेएनपीए बंदरात कंटेनर अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यातदारांना मोठा दिलासा; पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन; मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मुंबई येथील मेघदूत

राज्यातील शाळांमध्ये ‘केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’द्वारे हवामान शिक्षण मिळणार

मुंबई : पर्यावरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून जागरूकता निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने