कोकणातील प्रवाशांसाठी खूशखबर : तेजस आणि वंदे भारत एक्स्प्रेस पावसाळ्यातही सुरु राहणार; आरक्षण झाले खुले

Share

मुंबई : कोकणातील बहुसंख्य लोक मुंबईत स्थायिक झाले आहेत. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी कोकण रेल्वेच्या गाड्या कायम तुडूंब भरुन जात असतात. उन्हाळी सुट्ट्यांपासून गणपतीपर्यंत म्हणजे सप्टेंबरपर्यंत गावी जाण्यासाठी कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असते. यामुळे कोकणातील लोकांना सहज आरक्षण मिळत नाही. पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडत असतात. यामुळे या मार्गावर अनेक गाड्या रद्द केल्या जातात. त्यामुळे येत्या १० जूननंतरची कोकणात जाणारी वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस (Tejas Express and Vande Bharat Express) रद्द करण्यात आल्याची माहिती आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर देण्यात आली होती. यामुळे कोकण अन् गोवामध्ये जाणारे लोक संभ्रमात पडले होते.

कोकण रेल्वे पावसाळ्यात दरडीचा धोका लक्षात घेऊन १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत नवीन वेळापत्रक लागू करते. तसेच रेल्वेचे आरक्षण प्रवासाच्या १२० दिवस आधी सुरू होते असते. यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या तेजस आणि वंदे भारत एक्स्प्रेसचे रेल्वे आरक्षण खुले झाले नव्हते. परंतु आता या गाड्यांचे आरक्षण खुले झाले आहे. यामुळे तेजस आणि वंदे भारत एक्स्प्रेस पावसाळ्यात सुरु राहणार आहेत. त्यामुळे यासंदर्भात निर्माण झालेला गोंधळ दूर झाला आहे.

पावसाळी वेळापत्रकातही कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेस धावणार आहे. मध्य आणि कोकण रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. यामुळे आयआरसीटीसीच्या संकेत स्थळावर १० जून नंतरच्या या दोन रेल्वे गाड्यांचे आरक्षण सुरु करण्यात आले आहे. शुक्रवारपासून हे आरक्षण सुरु झाले आहे. यामुळे गणेश उत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.

दरम्यान, कोकण आणि मध्य रेल्वेने कोकण मार्गावर उन्हाळी सुट्यांमध्ये ३६ विशेष वातानुकूलित रेल्वे सुरु केल्या आहेत. ही रेल्वे २६ एप्रिल ते २ जूनपर्यंत आहे. यामुळे कोकणवासीयांना वातानुकूलित रेल्वेतून प्रवाशाचा आनंद मिळणार आहे. या विशेष रेल्वेमध्ये १५ तृतीय वातानुकूलित कोच आहे. तसेच मुंबई आणि दानापूर दरम्यान दोन विशेष रेल्वे चालवली जाणार आहे. ट्रेन संख्या ०१०१७ एसी स्पेशल ट्रेन २६ एप्रिल ते २ जूनपर्यंत प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, रविवार असणार आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन रात्री सव्वा दहा वाजता ही गाडी सुटणार आहे.

Recent Posts

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

2 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

2 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

2 hours ago

राखी वटवट्या

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…

2 hours ago

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

3 hours ago

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

3 hours ago