Devendra Fadnavis : आपल्याकडे महायुती तर राहुल गांधींकडे २६ पक्षांची खिचडी!

  43

काँग्रेसने अनेक वर्ष राज्य केलं, पण जनतेला फक्त चॉकलेट दाखवलं


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सणसणीत टीका


सांगली : सध्या देशात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय नेते उन्हातानात सभा घेत विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातच आज सांगली लोकसभा (Sangli Loksabha) मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचाराची सभा पार पडली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. त्यांनी सभेला संबोधित करताना शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी (Naremdra Modi) यांनी काय केले?, अशी टीका शरद पवारांनी अनेकदा केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत 'काँग्रेसने अनेक वर्ष राज्य केलं, पण जनतेला फक्त चॉकलेट दाखवलं', अशी खोचक टीका केली. शिवाय 'आपल्याकडे महायुती तर राहुल गांधींकडे २६ पक्षांची खिचडी आहे', असा टोलाही त्यांनी लगावला.


देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सांगलीमध्ये संजयकाका पाटील यांच्यासह अजून काही उमेदवार आहेत. या उमेदवारांची ही निवडणूक नाही. या निवडणुकीत दोनच पर्यांय आहेत. एक पर्याय नरेंद्र मोदी आणि दुसरा पर्याय राहुल गांधी. एकीकडे आपली महायुती तर दुसरीकडे राहुल गांधींकडे २६ पक्षांची खिचडी आहे. ही लढाई दोन व्यक्तिमत्वांमधील आहे. आपल्याकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखे मजबूत इंजिन आहे. त्या इंजिनबरोबर वेगवेगळ्या पक्षांचे डब्बे लावले आहेत. ही आपल्या विकासाची ट्रेन आहे. या विकासाच्या ट्रेनमध्ये गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर आहेत. महायुतीची ही गाडी सबका साथ सबका विकास म्हणत पुढे चालली आहे. विरोधकांकडे काय अवस्था आहे”, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.


पुढे ते म्हणाले, “राहुल गांधी म्हणतात मी इंजिन, तर शरद पवार म्हणतात मी इंजिन, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन. आता त्यांच्याकडे कोणीही डब्बे लावायला तयार नाही. शरद पवार यांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळे आहेत. उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरे यांनाच जागा आहे. त्यांच्या इंजिनमध्ये जनतेसाठी जागा नाही. काँग्रेसच्या सरकारने अनेक वर्षे राज्य केले. आघाडीच्या अनेक मंत्र्यांनी मंत्रिपदे भोगली. पण जनतेला फक्त चॉकलेट दिले. दुसरीकडे आपण ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य देण्याचे काम केले”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केली.



देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला


“ज्यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले होते, त्यावेळी महाराष्ट्रातील एका नेत्याने म्हटलं होतं की, नरेंद्र मोदी यांना उसाच्या शेतीबाबत काय कळतं. नरेंद्र मोदी यांना साखर कारखान्याबाबत काय कळतं. मात्र, आज दहा वर्षांनंतर मी दाव्याने सांगतो, ६० वर्षांचा त्यांचा इतिहास काढा आणि १० वर्षांचा मोदींचा कार्यकाळ काढा. साखर कारखान्यांसाठी आणि उसाच्या शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी यांनी जेवढे निर्णय घेतले, तेवढे आजपर्यंतच्या इतिहासात कधीही झाले नव्हते”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता शरद पवारांना लगावला.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक