कोकण किनारपट्टीवरील दर्याचा राजा कायम संकटाच्या खाईत…संपूर्ण किनारपट्टीवर मासळीचा दुष्काळ….

Share

अवैध एलईडी-पर्ससीन मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमार आर्थिक संकटात…पर्यटकांच्या खवय्येगिरीवर विरजण…

मुरुड(प्रतिनिधी संतोष रांजणकर)- संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मासळीचा मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला आहे. या दुष्काळामुळे दर्याचा राजा संकटाच्या खाईत जात आहे. अवैध एल ई डी मासेमारी पारंपरिक मच्छीमारांच्या जीवावर कर्दनकाळ ठरते आहे. यामुळे मुरुड जंजिरा फिरायला येणाऱ्या पर्यटकांच्या मासळी खवय्येगिरीवर विरजण पडले आहे.

वारंवार होणारे हवामानातील बदल, समुद्रातील वाढते जल प्रदुषण, समुद्रातील वाढते मानवी हस्तक्षेप, अवैध एलईडी-पर्ससीन मासेमारी दिवसेंदिवस समुद्रातील माशांचे उत्पादन घटत चालले आहे. राज्याच्या ७२० कि.मी. लांबीच्या समुद्र किनाऱपट्टीवर असलेल्या दर्याचा राजा गेली कित्येक वर्षे मासळी दुष्काळाच्या कचाट्यात सापडत चालला आहे.

या परिस्थितीत आज दर्याचा राजा संकटाच्या खाईत लोटला आहे. तो मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सागरी मासेमारीला तर मुळातच अनेक मर्यादा आहेत. त्यातच समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे अनेक प्रजातींचे मोठ्या प्रमाणावर मासे मृत्युमुखी पडत आहेत. तर काही प्रजाती स्थलांतर करीत आहेत. जागतिक तापमान वाढीमुळेही माशांसह समुद्रातील एकंदरीतच जीवसृष्टीवरच अनिष्ट परिणाम होत आहेत.

अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये झीरो ऑक्सिजन झोन निर्माण झाले आहेत. त्यामुळे अशा भागांतून काही प्रजातींचे मासे इतरत्र स्थलांतरित होत आहेत. घोळ, जिताडा, शेवंड, बोंबील, मांदेली, कर्ली, कोळंबी, पापलेट, सुरमई तसेच खेकडे याचबरोबर इतर अनेक प्रजातींचे समुद्रातील अस्तित्व काही वर्षांपासून कमी झाले आहे. त्याचबरोबर बेकायदेशीर पर्ससीन, एलईडी मासेमारीच्या अतिरेकाचा मोठा परिणाम पारंपरिक मच्छीमारांच्या आर्थिक स्थितीवर झाला आहे.

Recent Posts

चंद्रशेखर बावनकुळे यांना मातृशोक

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे…

6 mins ago

Kolhapur News : कोल्हापूरच्या दूधगंगा नदीत दोघांचा बुडून मृत्यू!

पावसाळी पर्यटन ठरतंय धोक्याचं... कोल्हापूर : पावसाळी पर्यटन (Monsoon trip) जीवावर बेतत असल्याच्या घटना सातत्याने…

8 mins ago

जनरल उपेंद्र द्विवेदी भारताचे नवे लष्करप्रमुख!

नवी दिल्ली : जनरल उपेंद्र द्विवेदी, पीव्हीएसएम, एव्हीएसएम (Upendra Dwivedi) आता भारताचे नवे लष्करप्रमुख झाले…

13 mins ago

लोणावळ्यात सायंकाळी ६ नंतर पर्यटकांना ‘संचारबंदी’

भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय पुणे : रविवारी भुशी धरणात पुण्यातील पाच जणांचा मृत्यू…

38 mins ago

Heavy rain in Konkan : कोकणात मुसळधार; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट!

पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत कोकणात, मध्य महाराष्ट्र,…

1 hour ago

Vidhanparishad Election : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा!

पंकजा मुंडेंची लागली वर्णी; आणखी कोणाकोणाला मिळाली संधी? मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) राज्यात…

1 hour ago