Shani: या ५ राशींवर नेहमी राहते शनिदेवाची कृपा, तुमची रास यात आहे का?

मुंबई: न्याय देवता शनी देव(shani dev) नेहमीच चिडलेले नसतात. ते कर्मानुसार लोकांना त्यांचे फळ देत असतात. आज जाणून घेऊया शनी देवाच्या प्रिय राशी कोणत्या आहेत ज्यांच्यावर सदैव त्यांची कृपा राहते.



वृषभ रास


वृषभ राशीचा स्वामी आहे शुक्र. शुक्र आणि शनीचे संबंध चांगले आहेत. वृषभ राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा नेहमी राहते. यांची बिघडलेली कामे शनीदेव करतात. वृषभ राशीची लोक अनेकदा राजकारणाशी संबंधित असतात त्यांना यश लवकर मिळते.



तूळ रास


तूळ रास ही शनी देवाच्या प्रिय राशींपैकी एक आहे. या राशीच्या लोकांवर शनी देवाचा हात नेहमी असतो. कोणत्याही कठीण काळात शनी देव यांना मदत करतात.



मकर रास


मकर राशीचे स्वामी खुद्द शनी देव आहेत. या राशीचे लोक भरपूर मेहनती आणि एनर्जीने भरपूर असतात. जे काम एकदा मनात घेतले की ते पूर्ण करूनच सोडतात. यामुळे शनी देव अशा लोकांचा हात कधी सोडत नाहीत.



कुंभ रास


कुंभ राशीचे स्वामीही शनीदेव आहेत. त्यामुळे ते त्यांची साथ सोडत नाहीत. या राशीच्या व्यक्तींवर शनिदेवाची विशेष कृपादृष्टी राहते. पैशाच्या तंगीमधूनही ते आपल्या प्रिय राशीच्या लोकांना बाहेर काढतात.



मीन रास


मीन राशीचे स्वामी गुरू आहे. गुरू देव आणि शनी देव यांच्यात मैत्रीचे संबंध आहेत. या राशीच्या लोकांवर शनी देव नेहमीच मेहरबान असतात. यामुळे त्यांना शनी देवाचा आशीर्वाद मिळतो.

Comments
Add Comment

बॉक्स ऑफिसवर दिसली झी स्टुडियोजच्या 'दशावतार' ची ताकद !

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत असलेल्या

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जमिनीचे येत्या १५ दिवसात हस्तांतरण : ॲड आशिष शेलार

रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपण्यात येईल : वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष

नरिमन पॉइंट ते वसईपर्यंत १० मार्गांवर होणार जलवाहतूक

मुंबई : महामुंबईत १० मार्गांवर जलवाहतूक सुरू होणार आहे. याद्वारे नव्या विमानतळाला चार मार्ग जोडले जाणार आहेत.