मुरुड तालुक्यात नाचवल्या जातात मानाच्या शासन काठ्या...

चार दिवस जत्रेचा धुरळा... करोडोंची उलाढाल...


मुरुड(प्रतिनिधी संतोष रांजणकर): मराठी नववर्षाच्या पहिल्याच चैत्र महिन्यात मुरूडसह तालुक्यातील गावात चार दिवस जत्रेचा धुरळा उडाला आहे. या जत्रेत अजून ही मानाच्या शासन काठ्या नाचवण्याची परंपरा कायम आहे. या जत्रेत करोडोंची उलाढाल होत असते.


चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या आदल्या दिवशी मुरूडची ग्रामदेवता श्रीकोटेश्वरी देवीच्या पालखी सोहळ्यापासुन या उत्सवाला सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी चैत्र पौर्णिमेला तेलवडे गावात जत्रा होते, तिसऱ्या दिवशी खार आंबोली व शेवटी शिघ्रे गावात जत्रा होते मुरुड, तेलवडे, खार अंबोली, शिघ्रे अशी चार गावांत सलग चार दिवस जत्रोत्सव भरवले जाते. या चैत्र महिन्यात शासन काठ्या नाचवण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. आणि ती आजतागायत जपली जात आहे.


तालुक्यातील सुमारे १२ ते १५ गावातील शासन काठ्या या जत्रेत वाजत गाजत, नाचत येतात, जत्रेत आल्यावर मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत असताना शासन काठी नाचवली जाते कधी एका हातावर घेऊन, कधी खांद्यावर, कधी डोक्यावर, तर कधी हनुवटीवर हे पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी होत असते. ही काठी नाचवताना उंच उंच आभाळात अभिमानाने डौलत कधी जमीनीच्या दिशेने पडत असते त्यावेळी बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो आणि काठी सांभाळणारे पुन्हा काठी आभाळाच्या दिशेने उभी करून नाचवू लागतात हा चित्तथरारक अनुभव पहाणाऱ्यांना येत असतो.


या जत्रेमध्ये विविध स्टॉल लावले जातात मिठाई, भजी, कटलरी, आईस्क्रीम, उसाचा रस, सौंदर्य प्रसाधने, मोबाईल ॲक्सेसरी, मेहंदी गोंदवणे, नाव गोंदवणे, विविध प्रकारचे कपडे, चायनीज, विविध घरगुती सामान, विविध लहान मुलांचे खेळ त्यामुळे या जत्रेत मोठ्या उत्साहात लाखो लोक भेटदेत असतात त्यामुळे चार दिवसांत करोडोंची उलाढाल होत असते.

Comments
Add Comment

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.