Indian Navy : ८वी उत्तीर्ण असणाऱ्यांनाही नौदलात मिळणार नोकरीची संधी

३००हून अधिक जागांसाठी भरती, असा करा अर्ज


मुंबई : अनेकजण त्यांच्या आयुष्यात सरकारी नोकरीच्या शोधात असतात. त्यातच तरुण पिढी भारतीय नौदलात (Indian Navy Jobs) नोकरीसाठी प्रयत्न करत असतात. अशातच भारतीय नौदलाने तरुणांना नवी संधी उपलब्ध करून दिली आहे. भारतीय नौदलाने तब्बल ३००हून अधिक शिकाऊ पदासांठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये विविध पदांचा समावेश आहे. त्यासाठीची अर्ज प्रक्रिया चालू झाली आहे.



असा करा अर्ज


उमेदवार indiannavy.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करु शकतात. २४ एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. येत्या १० मेपर्यंत त्यासाठी अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे या पदांसाठी फक्त आठवी आणि दहावी परीक्षेत उत्तीर्ण असलेले तरूणही अर्ज करू शकणार आहेत.



या पदांसाठी होणार भरती


भारतीय नौदलात वेगवेगळ्या ३०० शिकाऊ पदांसाठी भरती होणार आहे. यात फिटर पदासाठी ५०, मेकॅनिक पदासाठी ३५, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक पदासाठी २६ जागा आहेत. शिपराइट १८, वेल्‍डर १५, मशीनिस्‍ट १३, एमएमटीएम १३, पाईप फिटर १३, पेंटर ९, इंस्ट्रूमेन्ट मेकॅनिक ७, शीट मेटल वर्कर ३, टेलर ३, पॅटर्न मेकर २, फाऊन्ड्रीमॅन पदासाठीदेखील एक जागा आहे.



वयोमर्यादा काय, शिक्षणाची अट काय?


भारतीय नौदलात निघालेल्या या भरतीसाठी किमान वयाची अट ही १४ वर्षे आणि कमाल वयाची अट ही १८ वर्षे आहे. बिगर आयटीआय ट्रेडसाठी इयत्ता आठवी पास असणे गरजेचे आहे. फोर्जर हीट ट्रिटर या पदासाठी इयत्ता १० पास असणे गरजेचे आहे.



शारीरिक योग्यतेची अट काय?


या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर उमेदवाराची उंची ही १५० सेमी तर वजन ४५ किलोपेक्षा कमी नसावी. तसे छाती फुगवल्यानंतर ती ५ सेमीपेक्षा कमी नसावी. डोळ्यांची दृष्टी ही ६/६ पासून ६/९ पर्यंत असणे गरजेचे आहे.



निवड कशी होणार, पगार काय मिळणार?


भारतीय नौदलात वरील पदांवर नोकरी मिळवण्यासाठी अगोदर उमेदवाराला लेखी परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर उमेदवारांची मुलाखत होईल. त्यानंतर उमेदवाराची अंतिम निवड करण्यात येईल. निवड झाल्यास उमेदवाराला प्रतिमहिना ७७०० ते ८०५० रुपयांचे स्टायपंड मिळेल.

Comments
Add Comment

मिरा भाईंदरमधील २५४ एकर जमिनीसाठी; राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार

मुंबई : मिरा भाईंदर येथील मिठागराची तब्बल २५४ एकर मोक्याची शासकीय जमीन एका खासगी कंपनीच्या घशात जाण्याची

Decision of State Govt : जिल्हा बँकांतील ७० टक्के जागा यापुढे स्थानिकांसाठी राखीव

राज्य सरकारचा निर्णय; ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना नियम लागू मुंबई : राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा

Devendra Fadnavis : एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; भूजल पातळी वाढविण्यासाठी कामे करण्याचे निर्देश मुंबई : एल निनोच्या पार्श्वभूमीवर

Ashok Kharat Case: खरातच्या बँकेतील लॉकरमध्ये सापडलं घबाड, एक कोटी दहा लाखांचं सोनं अन...

Ashok Kharat Case : नाशिकमध्ये श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या अशोक खरात विरोधात नाशिक पोलीस आणि सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)

कोकणची पोरं हुश्शार ! बारावी प्रमाणे दहावीच्या निकालातही ९७.६२ टक्क्यांसह राज्यात कोकणच अव्वल

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात कोकण

दुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष टपाल तिकीट जारी होणार

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकीट जारी