Heat Wave : मुंबईकरांची होणार लाहीलाही! हवामान विभागाकडून सर्तकतेचा इशारा!

पुढील तीन दिवस मुंबईसह 'या' राज्यांत वाढणार उकाडा


वेधशाळेकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन


मुंबई : देशभरात वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या दोन आठवड्यापासून मुंबईत उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. त्यातच या तापमानाची वाढ आणखी तीन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे. मुंबईसह काही राज्यांत उकाडा वाढणार असल्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होणार असल्याचा सर्तकतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.


राज्यात अवकाळी पावसामुळे काही भागात गारवा पसरला आहे. मात्र मुंबईत निरभ्र आकाश आणि प्रखर सूर्यप्रकाशामुळे नागरिकांचा घामटा निघत आहे. मुंबई, ठाणे,पालघर, रायगडमध्ये आणखी दोन दिवस उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तापमान ३७ ते ३८ अंशांवर जाणार असून शनिवार, रविवार आणि सोमवारी उकाडा आणखी वाढणार आहे. तर २६, २७,२८ एप्रिल रोजी मुंबईसह पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाचा पारा चढणार आहे. उकाडा वाढणार असल्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्यक काळजी घेण्याचं आवाहन कुलाबा वेधशाळेकडून करण्यात आले आहे.



अशी घ्या काळजी-



  • उन्हात गेल्यास डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा.

  • पांढरे, सौम्य रंगाचे व सैल असणारे कपडे घाला.

  • पुरेसे पाणी प्यावे. ताक, लिंबूपाणी अशा द्रव्य प्रदार्थांचा आहार घ्या.

  • दुपारी १२ ते सायंकाळी ४ च्या दरम्यान बाहेर जाणे शक्यतो टाळा.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य