“काँग्रेस की लूट जिंदगी के साथ भी, बाद भी”

वारसा करावरून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल


नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून मोठा राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. पित्रोदांच्या वक्तव्यामुळे भाजपासह एनडीएतील सर्व घटकपक्ष काँग्रेसला लक्ष्य करू लागले आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 'काँग्रेस पक्षाचा एक मंत्र आहे. काँग्रेस की लूट जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. म्हणजे तुम्ही जीवंत आहात तोवर काँग्रेस तुमच्यावर जास्तीत जास्त कर लावून तुम्हाला मारून टाकेल आणि तुम्ही जीवंत नसाल तेव्हा तुमच्या मुलांवर वारसा कराचा ओझं टाकेल. ज्यांनी आपला संपूर्ण पक्ष पितृसंपत्ती म्हणून आपल्या मुलांना दिला आहे तेच लोक तुमची संपत्ती तुमच्या मुलांना देण्यापासून रोखण्याच्या विचारात आहेत. तुम्ही मेहनतीने कमावलेले पैसे तुमच्या मुलांना मिळू नये असे काँग्रेसला वाटते.',असा जोरदार हल्लाबोल मोदी यांनी केला.


भारतीय अर्थव्यवस्थेबाबत बोलताना सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेतील एका कराचा उल्लेख केला होता. “अमेरिकेत वारसा कर नावाचा एक कर आहे. एखाद्या व्यक्तीने १०० मिलियन डॉलर्स मूल्याइतकी संपत्ती कमावली असेल, तर त्याच्या निधनानंतर त्याच्या मुलांना साधारणपणे ४५ टक्के संपत्ती मिळते आणि उर्वरीत ५५ टक्के संपत्ती सरकार ताब्यात घेतं. हा एक वेगळा कायदा आहे. या कायद्यानुसार, तुम्ही तुमच्या हयातीत कमावलेली संपत्ती निधनानंतर जनतेसाठी सोडून दिली पाहिजे. सर्व संपत्ती नाही, परंतु, किमान निम्मी संपत्ती द्यायला हवी आणि मला हे न्याय्य वाटतं.”असे मत पित्रोदा यांनी मांडले होते.


त्यावर नरेंद्र मोदी म्हणाले, शाही परिवारातील (गांधी कुटुंब) राजकुमाराच्या सल्लागारांनी (सॅम पित्रोदा) एक वक्तव्य केले आहे. हे सल्लागार राजकुमाराच्या वडिलांबरोबरही काम करत होते. ते कुटुंब नेहमी या सल्लागाराचे सल्ले ऐकतो. ते सल्लागार म्हणाले आपल्या देशातील मध्यमवर्गीय लोक मेहनत करून पैसे कमावतात त्या पैशावर अधिक कर लावायला हवा. आता हे लोक त्याहून एक पाऊल पुढे गेले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की ते आता देशात वारसा कर लावतील. म्हणजेच आई-वडिलांकडून मिळणाऱ्या वारशावरही ते कर लावतील. याचा अर्थ तुम्ही मेहनत करून जी संपत्ती जमवता, ती संपत्ती किंवा ते पैसे तुमच्या मुलांना मिळणार नाहीत. कारण काँग्रेस सरकारचा पंजा ते पैसे तुमच्याकडून हिसकावणार आहे.

Comments
Add Comment

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन

West Bengal ED Raid : पश्चिम बंगालमध्ये ईडीअँक्शन मोडवर; एकूण १० ठिकाणी छापेमारी

- अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरण पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी (१६ मार्च) मोठी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी

बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय

पाटणा : बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. विधानसभेनंतर