PM Narendra Modi : काँग्रेसच्या राजवटीत हनुमान चालीसा ऐकणेही गुन्हा!

Share

राजस्थानमधून पंतप्रधानांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

जयपूर : लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) वारे वाहत असताना अनेक नेते देशभरात दौरे करत आहेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हेदेखील सातत्याने वेगवेगळ्या राज्यांचे दौरे करत आहेत. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आज राजस्थान दौऱ्यावर पोहोचले. राजस्थानमधील टोंक-सवाई माधोपूर येथील जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, राजस्थानने प्रत्येक वेळी भाजपाला पूर्ण आशीर्वाद दिला आहे. आज रामभक्त हनुमानजींच्या जयंतीचा पवित्र दिवस आहे. हनुमान जयंतीच्या संपूर्ण देशाला हार्दिक शुभेच्छा असं म्हणत पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

देशात पुन्हा मोदी सरकार येणार आहे, लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेव्हा-जेव्हा आपण विभागलो त्यावेळी शत्रूचा फायदा झाला. काँग्रेसची सत्ता असती तर स्फोट झाले असते. त्यांच्या राजवटीत विश्वास टिकवणे कठीण आहे. काँग्रेसने रामनवमीला बंदी घातली तर कर्नाटकात हनुमान चालीसाचे पठण केल्यामुळे मारहाण करण्यात आली. अशा काँग्रेसच्या राजवटीत हनुमान चालीसा ऐकणेही गुन्हा ठरतो आहे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली.

काँग्रेसवर साधला निशाणा

काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले की, २०१४ नंतर आणि आजही दिल्लीत काँग्रेसचे सरकार असते तर काय झाले असते. काँग्रेस असती तर आजही जम्मू-काश्मीरमध्ये आमच्या सैन्यावर दगडफेक झाली असती व काँग्रेस सरकारने काहीच केळं नसतं. आजही सीमेपलीकडील शत्रूंनी येवून आमच्या सैनिकांची मुंडकी हिसकावून घेतली असती. सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शन लागू झाली नाही, देशाच्या कानाकोपऱ्यात बॉम्बस्फोट होत राहिले असते. काँग्रेस असती तर भ्रष्टाचाराचे नवे मार्ग शोधले असते असे पंतप्रधानांनी सभेत म्हटले.

काँग्रेसच्या काळात हनुमान चालीसा ऐकणे गुन्हा

काँग्रेसच्या राजवटीत हनुमान चालीसा ऐकणेही गुन्हा ठरतो. काही दिवसांपूर्वी काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात एका छोट्या दुकानदाराला त्याच्या दुकानात बसून हनुमान चालीसा ऐकत असल्याने त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. ‘राम-राम’ म्हणणाऱ्या राजस्थानमध्ये रामनवमीवर काँग्रेसने बंदी घातली होती, मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्यांना काँग्रेसने सरकारी संरक्षण दिले होते. मात्र भाजपाचे सरकार आल्यानंतर तुमच्या विश्वासावर कोणालाही प्रश्नचिन्ह लावण्याचे धाडस होणार नाही, असे पंतप्रधानांनी म्हटले.

मी त्यांच्या राजकारणाचा पर्दाफाश केला

परवा राजस्थानमध्ये पंतप्रधानांनी देशासमोर काही गोष्टींच सत्य ठेवलं होतं, त्यामुळे काँग्रेस व इंडी आघाडीत सर्वत्र खळबळ उडाली होती. काँग्रेस तुमची संपत्ती हिसकावून त्यांच्या खास लोकांना वाटून देण्याचं षडयंत्र रचत होते. मोदींनी काँग्रेसच्या या राजकारणाचा पर्दाफाश केल्याने काँग्रेसने त्यांच्यासाठी अपशब्द वापरले होते. काँग्रेस सत्याला इतके का घाबरतात? ते त्यांचे धोरण इतके का लपवतात, त्यांनीच बनवलेली पॉलिसी स्वीकारण्यास ते का घाबरतात? हिंमत असेल तर स्वीकारा, आम्ही तुमच्याशी लढायला तयार आहोत, असे पंतप्रधानांनी यावेळी म्हटले.

Recent Posts

Abhijna Bhave: स्वामींच्या मठात जाताना अभिनेत्रीच्या नवऱ्याला आला वेगळाच अनुभव!

मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…

10 minutes ago

वाळवंटातील बांधकाम क्षेत्रात अब्दुल्ला अ‍ॅण्ड असोसिएट्स

शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…

1 hour ago

भारतासाठी कंटेंट हब बनण्याची सुवर्णसंधी!

वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…

1 hour ago

काश्मीरची ढगफुटी : मानवजातीला इशारा

काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…

1 hour ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २२ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…

1 hour ago

Mhada House : सर्वसामान्यांना मिळणार स्वस्तात घर! म्हाडा करणार घरांच्या किंमतीत घट

किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…

1 hour ago