Pune Crime : पुण्यात नेमकं चाललंय काय? सलग चौथ्या दिवशी गोळीबाराने येरवडा हादरलं!

  56

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये (Pune Crime) प्रचंड वाढ झाली आहे. पुण्यात शिकत असलेल्या तरुणांवर एकतर्फी प्रेमातून कोयता हल्ल्याच्या घटना किंवा पुण्यात सक्रिय असलेली कोयता गँग यामुळे विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढीस लागलं आहे. त्यातच एक धक्कादायक घटना पुण्याच्या येरवडा भागात घडली आहे. पुण्यात सलग चौथ्या दिवशी येरवडा परिसरात पहाटेच्या वेळी गोळीबाराची घटना समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भयंकर भीतीचं वातावरण पसरलं आहे.


येरवडा येथील अग्रेसन स्कूल समोर पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान गोळीबाराची घटना घडली. जुन्या वादाचा राग मनात धरून एकावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. आकाश चंदाले याने विकी चंदाले या दोघांवर गोळीबार केला आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याचं देखील पोलीस तपासात समोर आलं आहे.



सलग चौथ्या दिवशी गोळीबार


पुण्यात याआधी जंगली महाराज रोड, हडपसर, सिंहगड रोडवर गोळीबाराच्या घटना समोर आल्या होत्या. जंगली महाराज रोडवर धीरज दिनेशचंद्र आरगडे बांधकाम व्यावसायिकावर स्विगीचे वस्त्र परिधान करून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. तर हडपसरमधील शेवाळेवाडी येथे ठेकेदारीच्या वादातून दोन सैनिकांमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार झाला. यापूर्वी देखील सतत पुण्यात अशा गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. या घटना लागोपाठ घडत असल्यामुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या