जे दहशतवादाला प्रोत्साहन देत होते त्यांना साधे पीठ मिळणे मुश्किल झाले आहे, पंतप्रधान मोदींचा निशाणा

  52

दमोह: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर आपल्या रॅलीतील भाषणादरम्यान जोरदार टीका केली आहे. जे देश दहशतवाद निर्यात करत होते ते साध्या पीठासाठी संघर्ष करत आहेत. पंतप्रधानांनी हे विधान मध्य प्रदेशच्या दमोह येथे निवडणुकीच्या रॅलीमध्ये जनतेला संबोधित करताना म्हटले.


पंतप्रधान टीका करताना म्हणाले, जगातील अनेक देश ज्यांची स्थिती खूपच खराब आहे. अनेक जण दिवाळखोरीची शिकार बनले आहेत. इतकं की आमच्या शेजारील देश जो दहशतवादाला प्रोत्साहन देत होता त्यांना आता पीठ मिळणे मुश्किल झाले आहे. तर दुसरीकडे भारत देश जो परदेशातून हत्यारे खरेदी करत होता आता दुसऱ्या देशांना उच्च तंत्रज्ञानाची हत्यारे निर्यात करत आहे.


पंतप्रधान मोदी म्हणाले, देशातील लोकांनी केंद्रात एक मजबूत आणि स्थिर सरकारसाठी मतदान केले पाहिजे. त्यांनी या गोष्टीवर जोर दिला की त्यांचे सरकार राष्ट्र प्रथम या सिद्धांतावर काम करते आणि कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी पडत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकासह पश्चिमेकडून दबाव असताना रशियाकडून तेल खरेदी भारताच्या पावलाबाबत बचावात्मक भूमिका घेतली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील लोकांना स्वस्त तेल मिळावे तसेच शेतकऱ्यांना पुरेसा खतपुरवठा व्हावा यासाठी आम्ही राष्ट्रहितासाठी हा निर्णय घेतला आहे. आम्ही गेल्या १० वर्षांत पाहिले की एक स्थिर सरकार लोकांच्या हितामध्ये कसे काम करते. कोरोनाच्या संकटादरम्यान जगभरात अराजकता होती मात्र एका मजबूत भाजप सरकारने जगभरातील आपल्या नागरिकांना माघारी आणले.

Comments
Add Comment

Airtel Down: एअरटेल सेवा बंद! कॉल आणि इंटरनेट सेवेवरही परिणाम

मुंबई: एअरटेल डाउन डिटेक्टरनुसार देशभरातील एअरटेल ग्राहकांना गेल्या काही तासांपासून नेटवर्क आणि इंटरनेट

राज्यपालांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, २१ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी दाखल करणार उमेदवारी अर्ज

नवी दिल्ली: एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आज दिल्लीत पोहोचले

चीनचे परराष्ट्र मंत्री आजपासून भारत दौऱ्यावर, सीमावाद आणि द्विपक्षीय संबंधांवर होणार चर्चा

नवी दिल्ली: चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आजपासून (सोमवार, १८ ऑगस्ट) तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. या

उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांचे अभिनंदन

नवी दिल्ली: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर येथून परतताच थेट राजभवन गाठून मा. राज्यपाल सी. पी.

बिजू जनता दलाचे (बीजेडी) प्रमुख आणि ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक पुन्हा रुग्णालयात दाखल

मुंबई: बिजू जनता दलाचे (बीजेडी) प्रमुख आणि ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना वयोमानाशी संबंधित

उपराष्ट्रपतीपदासाठी NDA कडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे नाव जाहीर

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची आज नवी दिल्ली येथे महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत