जे दहशतवादाला प्रोत्साहन देत होते त्यांना साधे पीठ मिळणे मुश्किल झाले आहे, पंतप्रधान मोदींचा निशाणा

Share

दमोह: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर आपल्या रॅलीतील भाषणादरम्यान जोरदार टीका केली आहे. जे देश दहशतवाद निर्यात करत होते ते साध्या पीठासाठी संघर्ष करत आहेत. पंतप्रधानांनी हे विधान मध्य प्रदेशच्या दमोह येथे निवडणुकीच्या रॅलीमध्ये जनतेला संबोधित करताना म्हटले.

पंतप्रधान टीका करताना म्हणाले, जगातील अनेक देश ज्यांची स्थिती खूपच खराब आहे. अनेक जण दिवाळखोरीची शिकार बनले आहेत. इतकं की आमच्या शेजारील देश जो दहशतवादाला प्रोत्साहन देत होता त्यांना आता पीठ मिळणे मुश्किल झाले आहे. तर दुसरीकडे भारत देश जो परदेशातून हत्यारे खरेदी करत होता आता दुसऱ्या देशांना उच्च तंत्रज्ञानाची हत्यारे निर्यात करत आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, देशातील लोकांनी केंद्रात एक मजबूत आणि स्थिर सरकारसाठी मतदान केले पाहिजे. त्यांनी या गोष्टीवर जोर दिला की त्यांचे सरकार राष्ट्र प्रथम या सिद्धांतावर काम करते आणि कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी पडत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकासह पश्चिमेकडून दबाव असताना रशियाकडून तेल खरेदी भारताच्या पावलाबाबत बचावात्मक भूमिका घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील लोकांना स्वस्त तेल मिळावे तसेच शेतकऱ्यांना पुरेसा खतपुरवठा व्हावा यासाठी आम्ही राष्ट्रहितासाठी हा निर्णय घेतला आहे. आम्ही गेल्या १० वर्षांत पाहिले की एक स्थिर सरकार लोकांच्या हितामध्ये कसे काम करते. कोरोनाच्या संकटादरम्यान जगभरात अराजकता होती मात्र एका मजबूत भाजप सरकारने जगभरातील आपल्या नागरिकांना माघारी आणले.

Recent Posts

Kolhapur News : कोल्हापुरात ट्रक आणि एसटी बसची जोरदार धडक!

कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…

18 minutes ago

Lalit Machanda Suicide: ‘तारक मेहता….’ फेम अभिनेते ललित मनचंदा यांनी ‘या’ कारणांमुळे केली आत्महत्या

मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…

23 minutes ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…

2 hours ago

मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा; राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छीमारांना होणार फायदा

ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…

2 hours ago

फडणवीस सांगतील तसं चालणार! थोपटेंनंतर तांबेही भाजपाच्या दिशेने?

पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…

2 hours ago

Sangram Thopte : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेसच्या माजी आमदारांनी हाती घेतले ‘कमळ’

पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…

2 hours ago