राज्यात पहिल्या टप्प्यात ५४. ८५% मतदान, देशात ५९.७१ टक्के मतदारांनी बजावला हक्क

सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये तर सर्वात कमी मतदान हे बिहारमध्ये


मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची निवडणूक शुक्रवारी पार पडली आहे. काही घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले आहे. २१ राज्य आणि केंद्र शासित प्रशांतील १०२ मतदारसंघांमध्ये मतदान पार पड़ले आहे. यापैकी पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक तर बिहारमध्ये सर्वात कमी मतदान नोंदविले गेले आहे. या मतदारसंघांमध्ये सकाळी ७ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान घेण्यात येत आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंतचे मतदान टक्केवारी आली आहे. देशात ५९.७१ टक्के मतदान झाले तर महाराष्ट्रात पाच लोकसभा मतदारसंघात ५४. ८५% मतदान झाले.


सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले असून ७७.५७% मतदान झाले आहे. दुसरा क्रमांक त्रिपुरा राज्याचा असून ७६.१०% मतदान झाले आहे. मेघालय ६९.९१%, मध्य प्रदेश ६३.२५%, तामिळनाडू ६२.०८%, उत्तर प्रदेश ५७.५४%, बिहार ४६.३२%, उत्तराखंड ५३.५६%, जम्मू-कश्मीर ६५.०८%, राजस्थान ५०.२७%, छत्तीसगड ६३.४१%, आसाम ७०.७७%, पाँडिचेरी ७२.८४%, अरुणाचल प्रदेश ६४.०७%, नागालँड ५६.१८%,मिझोरम ५३.९६%, सिक्किम ६८.०६%, मणिपूर ६८.६२%, अंदमान निकोबार ५६.८७%, लक्षद्वीप ५९.०२%, महाराष्ट्र ५४.८५% एवढे मतदान झाले आहे.


सर्वात कमी मतदान हे बिहारमध्ये झालेले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात जास्त मतदान झाले तर सत्ताधाऱ्यांविरोधात मत गेल्याचे जाणकार सांगतात. २०१४ पेक्षा २०१९ मध्ये जास्त मतदान झाले होते. परंतु भाजपाचे सरकार पुन्हा आले होते. तर २००९ पेक्षा २०१४ मध्ये जास्त मतदान झाले होते. तेव्हा सत्तांतर झाले होते. यामुळे हे कमी झालेले मतदान कोणाच्या फायद्याचे हे ४ जुलैलाच समजणार आहे.



पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे -


रामटेक ५२.३८ टक्के
नागपूर ४७.९१ टक्के
भंडारा- गोंदिया ५६.८७ टक्के
गडचिरोली- चिमूर ६४.९५ टक्के
आणि चंद्रपूर ५५.११ टक्के

Comments
Add Comment

अमरावती जिल्ह्यात नक्की चाललंय तरी काय? अखेरच्या क्षणी भाजपची मोठी खेळी

अमरावती : राज्यात काही दिवसांपूर्वीच महापालिकांच्या निवडणुकांचा गुलाल हा उधळला गेला. सत्ताधारी आणि विरोधक

Nashik Mayor : ठरलं तर मग! नाशिकमध्ये महापौर भाजपचा होणार, तर उपमहापौर...?

नाशिक : नाशिकच्या राजकारणात आज एक मोठी आणि ऐतिहासिक घडामोड पाहायला मिळाली. नाशिक महानगरपालिकेच्या

मुलतानी बेकरीच्या मालकाने उचलेले टोकाचे पाऊल; सोलापुरात खळबळ

सोलापूर: सोलापुरात एकेकाळी अत्यंत प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीचे मालक सुनील मोतीलाल सदारंगानी यांनी

Mumbai Pune Expressway: तिसऱ्या दिवशीही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे जैसे थे..; प्रवाशी हतबल

मुंबई: आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी पहाटेपासूनच मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी झाल्याने

HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी; HSRP नंबर प्लेट बसवली नाही तर...

वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. तुम्ही जर अजूनही तुमच्या गाडीला नवीन नंबरप्लेट बसवून घेतली नसेल तर तुमचे

Jalna Black Magic News: जालन्यात एका हॉटेलसमोर लिंबू आणि बाहुल्या आढळल्या, काळ्या जादूने गावात खळबळ

जालना: जालना जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोकरदन तालुक्यामध्ये एका अज्ञात महिलेने हॉटेलसमोर