जागतिक हेरीटेजदिनी जंजिरा किल्यात विनामुल्य प्रवेश

पर्यटकवाढीसाठी पुरातत्व विभागाचा स्तुत्य उपक्रम


मुरूड : जागतिक हेरीटेज दिवस (World Heritage Day) १८ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. या निमित्ताने जंजिरा किल्ला (Janjira Fort) पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पुरातत्व विभागातर्फे प्रवेश मोफत दिला जातो. पर्यटक वाढीसाठी व पर्यटकांना गड, दुर्ग किल्ल्यांची ओळख व्हावी यासाठी पुरातत्व विभागातर्फे हा दिवस साजरा करण्यात येतो.


पृथ्वीवरील सांस्कृतिक वारसा आणि विविधता यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १८ एप्रिल या दिवशी, 'वर्ल्ड हेरिटेज डे' म्हणजेच जागतिक वारसा दिवस साजरा केला जातो. हा दिवस सर्वप्रथम संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था अथवा युनेस्कोद्वारे [UNESCO] साजरा केला होता.


लोकांना तसेच स्थानिक नागरिकांना त्यांच्या सांस्कृतिक वारशाचे, विविध स्मारकांच्या जतनाचे महत्त्व समजण्यासाठी आणि ते जपण्यास प्रेरणा देणे असा या दिवसाचा हेतू आहे.



१९८३ सालापासून स्मारके आणि साइट्सवरील आंतरराष्ट्रीय परिषदेने थीम ठेवण्यास सुरुवात केली. त्या थीमनुसार हा दिवस साजरा केला जातो. यंदा वर्ष २०२४ ची थीम ही 'व्हेनिस चार्टरच्या दृष्टीतून आपत्ती आणि संघर्ष' [Disasters & Conflicts Through the Lens of the Venice Charter] अशी ठेवण्यात आली आहे.


मुरूड -राजपुरी येथील ऐतिहासिक नबाबकालिन प्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी देश-विदेशातून लाखो पर्यटक येत असतात. किल्ले पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या प्रकारे ओळख व्हावी व त्याचे महत्त्व समजावे म्हणून पुरातत्व विभागातर्फे हा दिवस जागतिक हेरीटेज डे म्हणून साजरा करण्यात येत असतो. या दिवशी जंजिरा किल्ला प्रवेश निःशुल्क ठेवण्यात आले आहे.


Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

खारघर किनारा मार्ग प्रकल्पामुळे भविष्यात नवी मुंबईकरांचा प्रवास सुलभ

नवी मुंबई  : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्पामुळे भविष्यात रस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड