Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार संपुष्टात

Share

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या(loksabha election 2024) पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार बुधवारी संध्याकाळी सहा वाजता संपुष्टात आला. भारतीय निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या विधानात सांगितले की लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार नॉर्थ ईस्टमध्ये दुपारी तीन वाजता संपला होता. दर देशाच्या इतर भागांमध्ये हा प्रचार संध्याकाळी सहा वाजता संपला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या नलबाडी येथे होते. आज त्यांची एक रॅली तेथे पार पडली. या रॅलीदरम्यान ते म्हणाले, ४ जूनला काय निकाल असेल हे स्पष्ट दिसत आहे. अशातच लोक म्हणत आहेत की चार जून, ४०० पार! पुन्हा एकदा मोदी सरकार.

काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी सहारणपूर येथे रोड शो केला. येथे त्यांनी २५ मिनिटे १.५ किमी पदयात्रा केली. त्या या दरम्यान म्हणाल्या, मी प्रत्येक ठिकाणी हेच म्हणत आहे की ही निवडणूक जनतेची असणार आहे. लोकांच्या मुद्द्यांवर असली पाहिजे. इतर नेते इकडे तिकडे ध्यान भटकवण्याचे काम करत आहे.

लोकसभा निवडणूक २०२४च्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल २०२४ला राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश एकूण २१ ठिकाणच्या १०२ जागांवर मतदान होणार आहे. या दरम्यान अरूणाचलमधील दोन, आसामच्या पाच, बिहारच्या चार, छत्तीसगडच्या एक, मध्य प्रदेशमधील सहा, महाराष्ट्रातील पाच, मणिपूरचे दोन, मेघालयमधील दोन, मिझोरमच्या एक, नागालँडमधील एक, राजस्थानातील १२, सिक्कीमधील एक, तामिळनाडूच्या ३९, त्रिपुरामधील एक, यूपीमधील आठ, उत्तराखंडच्या पाच, पश्चिम बंगालच्या तीन, अंदमान आणि निकोबारमधील एक, जम्मू-काश्मीरमधील एक, लक्षद्वीपमधील एक आणि पाँडिचेरीच्या एका जागेवर मतदान होणार आहे.

Recent Posts

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

19 minutes ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

47 minutes ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

1 hour ago

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

6 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

7 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

7 hours ago