Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार संपुष्टात

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या(loksabha election 2024) पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार बुधवारी संध्याकाळी सहा वाजता संपुष्टात आला. भारतीय निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या विधानात सांगितले की लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार नॉर्थ ईस्टमध्ये दुपारी तीन वाजता संपला होता. दर देशाच्या इतर भागांमध्ये हा प्रचार संध्याकाळी सहा वाजता संपला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या नलबाडी येथे होते. आज त्यांची एक रॅली तेथे पार पडली. या रॅलीदरम्यान ते म्हणाले, ४ जूनला काय निकाल असेल हे स्पष्ट दिसत आहे. अशातच लोक म्हणत आहेत की चार जून, ४०० पार! पुन्हा एकदा मोदी सरकार.


काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी सहारणपूर येथे रोड शो केला. येथे त्यांनी २५ मिनिटे १.५ किमी पदयात्रा केली. त्या या दरम्यान म्हणाल्या, मी प्रत्येक ठिकाणी हेच म्हणत आहे की ही निवडणूक जनतेची असणार आहे. लोकांच्या मुद्द्यांवर असली पाहिजे. इतर नेते इकडे तिकडे ध्यान भटकवण्याचे काम करत आहे.


लोकसभा निवडणूक २०२४च्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल २०२४ला राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश एकूण २१ ठिकाणच्या १०२ जागांवर मतदान होणार आहे. या दरम्यान अरूणाचलमधील दोन, आसामच्या पाच, बिहारच्या चार, छत्तीसगडच्या एक, मध्य प्रदेशमधील सहा, महाराष्ट्रातील पाच, मणिपूरचे दोन, मेघालयमधील दोन, मिझोरमच्या एक, नागालँडमधील एक, राजस्थानातील १२, सिक्कीमधील एक, तामिळनाडूच्या ३९, त्रिपुरामधील एक, यूपीमधील आठ, उत्तराखंडच्या पाच, पश्चिम बंगालच्या तीन, अंदमान आणि निकोबारमधील एक, जम्मू-काश्मीरमधील एक, लक्षद्वीपमधील एक आणि पाँडिचेरीच्या एका जागेवर मतदान होणार आहे.

Comments
Add Comment

Budget 2026-27 : तब्बल १५० ठिकाणी पत्रकार परिषदा, सोशल मीडियावरील इन्फ्लुएंसर्सशी संवाद; 'या' आहेत भाजपच्या अर्थसंकल्पासाठीच्या योजना

अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी रोजी २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पात सुरू केलेल्या

धक्कादायक! आयटीचे छापे पडताच बंगळुरुतील प्रसिद्ध बिल्डरने संपवलं स्वतःचं आयुष्य

बंगळुरु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॉन्फिडंट ग्रुपचे अध्यक्ष सी जे रॉय यांनी स्वतःला गोळी झाडून

रायबरेलीत राहुल, सोनिया, प्रियंका गांधींविरुद्ध तक्रार

रायबरेली : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात उत्तर प्रदेशमधील रायबरेलीमध्ये

अयोध्येत रामाच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढली

पुजाऱ्यांना तीन पाळ्यांमध्ये काम करावे लागणार नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराला आता दोन वर्षे पूर्ण झाली

शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालय आणि सॅनिटरी पॅड अनिवार्य

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आदेश अन्यथा शाळांची मान्यता होणार रद्द नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने

Tirupati laddu : तिरुपती लाडू भेसळ प्रकरण : सीबीआयकडून मोठा खुलासा; लाडूमध्ये 'बीफ टॅलो' किंवा प्राण्यांची चरबी नसल्याचे स्पष्ट

नेल्लोर : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या तिरुपती लाडू भेसळ प्रकरणात सीबीआयने (CBI) आपला अंतिम आरोपपत्र (Chargesheet)