Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार संपुष्टात

  90

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या(loksabha election 2024) पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार बुधवारी संध्याकाळी सहा वाजता संपुष्टात आला. भारतीय निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या विधानात सांगितले की लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार नॉर्थ ईस्टमध्ये दुपारी तीन वाजता संपला होता. दर देशाच्या इतर भागांमध्ये हा प्रचार संध्याकाळी सहा वाजता संपला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या नलबाडी येथे होते. आज त्यांची एक रॅली तेथे पार पडली. या रॅलीदरम्यान ते म्हणाले, ४ जूनला काय निकाल असेल हे स्पष्ट दिसत आहे. अशातच लोक म्हणत आहेत की चार जून, ४०० पार! पुन्हा एकदा मोदी सरकार.


काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी सहारणपूर येथे रोड शो केला. येथे त्यांनी २५ मिनिटे १.५ किमी पदयात्रा केली. त्या या दरम्यान म्हणाल्या, मी प्रत्येक ठिकाणी हेच म्हणत आहे की ही निवडणूक जनतेची असणार आहे. लोकांच्या मुद्द्यांवर असली पाहिजे. इतर नेते इकडे तिकडे ध्यान भटकवण्याचे काम करत आहे.


लोकसभा निवडणूक २०२४च्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल २०२४ला राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश एकूण २१ ठिकाणच्या १०२ जागांवर मतदान होणार आहे. या दरम्यान अरूणाचलमधील दोन, आसामच्या पाच, बिहारच्या चार, छत्तीसगडच्या एक, मध्य प्रदेशमधील सहा, महाराष्ट्रातील पाच, मणिपूरचे दोन, मेघालयमधील दोन, मिझोरमच्या एक, नागालँडमधील एक, राजस्थानातील १२, सिक्कीमधील एक, तामिळनाडूच्या ३९, त्रिपुरामधील एक, यूपीमधील आठ, उत्तराखंडच्या पाच, पश्चिम बंगालच्या तीन, अंदमान आणि निकोबारमधील एक, जम्मू-काश्मीरमधील एक, लक्षद्वीपमधील एक आणि पाँडिचेरीच्या एका जागेवर मतदान होणार आहे.

Comments
Add Comment

IPS सिद्धार्थ कौशल यांचा राजीनामा

नवी दिल्ली : भारतीय पोलीस सेवेत (IPS / Indian Police Services) १३ वर्ष सेवा केल्यानंतर आंध्र प्रदेशमधील आयपीएस अधिकारी सिद्धार्थ

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई: भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड

अ‍ॅपलच्या योजनेला ब्रेक; ३०० चिनी अभियंते भारतातून माघारी

मुंबई : भारताची जागतिक उत्पादन केंद्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या अ‍ॅपलच्या 'आयफोन १७' प्रकल्पाला

भारतीय सैन्याला मिळणार १.०३ लाख कोटी रुपयांची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि वाहने

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १.०३ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी

दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार केवळ तिबेटी परंपरेलाच: किरेन रिजिजू

तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीबाबत चीनच्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नांना भारताचे

ब्रिटिश रॉयल नेव्हीचे बंद पडलेले F35 B लढाऊ विमान, भारतातून तुकडे करुन परत पाठवणार

केरळमध्ये अडकलेल्या लढाऊ विमानाची अखेर दुरुस्ती झालीच नाही, शेवटी तुकड्यांमध्ये ब्रिटनला