भारताची लोकसंख्या १४४ कोटींहून जास्त: ७७ वर्षांत दुप्पट

१४ वर्षांपर्यंतची लोकसंख्या सुमारे ३५ कोटी : संयुक्त राष्ट्राचा अहवाल


नवी दिल्ली : युनायटेड नेशन्स हेल्थ एजन्सी युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA) च्या ताज्या अहवालात भारताची लोकसंख्या गेल्या ७७ वर्षांत दुप्पट झाल्याचा दावा करण्यात आला आहे.अहवालानुसार, २००६-२३ दरम्यान भारतात बालविवाह २३ % कमी झाले आहेत, तसेच प्रसूतीदरम्यान महिलांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे.UNFPA च्या स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन २०२४ च्या रिपोर्ट इंटर-वोव्हन लाइव्हज, थ्रेड्स ऑफ होप: एंडिंग इनइक्वलिटी इन लैंगिक आणि प्रजनन आरोग्य आणि अधिकारानुसार, भारताची लोकसंख्या १४४.१७ कोटींवर पोहोचली आहे.या वर्षाच्या सुरुवातीला भारताने सर्वाधिक लोकसंख्येचा देश चीनला मागे टाकले होते, ज्याची लोकसंख्या १४२.५ कोटी आहे. भारत सरकारने २०११ मध्ये केलेली शेवटची जनगणना १२१ कोटी लोकसंख्येची नोंद झाली होती.


अहवालानुसार, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी २४ टक्के लोकसंख्या ०-१४ वर्षे वयोगटातील लोकांची आहे. तर १५-६४ वर्षांची संख्या सर्वाधिक ६४ टक्के आहे. देशातील पुरुषांचे सरासरी वय ७१ वर्षे आहे, तर महिलांचे सरासरी वय ७४ वर्षे आहे. या युनीएफपीएच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, भारतातील लैंगिक आणि प्रजनन आरोग्य ३० वर्षांतील सर्वोत्तम पातळीवर आहे. त्यामुळेच, भारतात प्रसूतीदरम्यान मृत्यू होण्याचे प्रमाणही घटले आहे. जगातील अशा मृत्यूंमध्ये भारताचा वाटा ८ टक्के आहे. त्याच वेळी, २००६-२०२३ दरम्यान झालेल्या एकूण विवाहांपैकी २३ टक्के बालविवाह होते. ज्यामध्ये मुलगा आणि मुलीचे वय २१ आणि १८ वर्षांपेक्षा कमी होते.


या अहवालात जागतिक स्तरावर महिलांच्या लैंगिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली असून, लाखो महिला आणि मुली अजूनही आरोग्याच्या महत्त्वाच्या उपाययोजनांपासून वंचित आहेत. २०१६ पासून दररोज ८०० स्त्रिया बाळाला जन्म देताना मरण पावतात. आजही एक चतुर्थांश महिला आपल्या जोडीदारासोबत सेक्स करण्यास नकार देऊ शकत नाहीत.आजही,लैंगिक संबंध ठेवणाऱ्या १० पैकी १ महिला गर्भनिरोधक पद्धतींबद्दल स्वतःहून निर्णय घेऊ शकत नाही. अहवालात असे म्हटले आहे की डेटा असलेल्या ४०% देशांमध्ये शारीरिक संबंधांबाबत निर्णय घेण्यात महिला पुरुषांपेक्षा मागे आहेत.

Comments
Add Comment

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन

West Bengal ED Raid : पश्चिम बंगालमध्ये ईडीअँक्शन मोडवर; एकूण १० ठिकाणी छापेमारी

- अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरण पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी (१६ मार्च) मोठी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी

बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय

पाटणा : बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. विधानसभेनंतर