भारताची लोकसंख्या १४४ कोटींहून जास्त: ७७ वर्षांत दुप्पट

१४ वर्षांपर्यंतची लोकसंख्या सुमारे ३५ कोटी : संयुक्त राष्ट्राचा अहवाल


नवी दिल्ली : युनायटेड नेशन्स हेल्थ एजन्सी युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA) च्या ताज्या अहवालात भारताची लोकसंख्या गेल्या ७७ वर्षांत दुप्पट झाल्याचा दावा करण्यात आला आहे.अहवालानुसार, २००६-२३ दरम्यान भारतात बालविवाह २३ % कमी झाले आहेत, तसेच प्रसूतीदरम्यान महिलांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे.UNFPA च्या स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन २०२४ च्या रिपोर्ट इंटर-वोव्हन लाइव्हज, थ्रेड्स ऑफ होप: एंडिंग इनइक्वलिटी इन लैंगिक आणि प्रजनन आरोग्य आणि अधिकारानुसार, भारताची लोकसंख्या १४४.१७ कोटींवर पोहोचली आहे.या वर्षाच्या सुरुवातीला भारताने सर्वाधिक लोकसंख्येचा देश चीनला मागे टाकले होते, ज्याची लोकसंख्या १४२.५ कोटी आहे. भारत सरकारने २०११ मध्ये केलेली शेवटची जनगणना १२१ कोटी लोकसंख्येची नोंद झाली होती.


अहवालानुसार, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी २४ टक्के लोकसंख्या ०-१४ वर्षे वयोगटातील लोकांची आहे. तर १५-६४ वर्षांची संख्या सर्वाधिक ६४ टक्के आहे. देशातील पुरुषांचे सरासरी वय ७१ वर्षे आहे, तर महिलांचे सरासरी वय ७४ वर्षे आहे. या युनीएफपीएच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, भारतातील लैंगिक आणि प्रजनन आरोग्य ३० वर्षांतील सर्वोत्तम पातळीवर आहे. त्यामुळेच, भारतात प्रसूतीदरम्यान मृत्यू होण्याचे प्रमाणही घटले आहे. जगातील अशा मृत्यूंमध्ये भारताचा वाटा ८ टक्के आहे. त्याच वेळी, २००६-२०२३ दरम्यान झालेल्या एकूण विवाहांपैकी २३ टक्के बालविवाह होते. ज्यामध्ये मुलगा आणि मुलीचे वय २१ आणि १८ वर्षांपेक्षा कमी होते.


या अहवालात जागतिक स्तरावर महिलांच्या लैंगिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली असून, लाखो महिला आणि मुली अजूनही आरोग्याच्या महत्त्वाच्या उपाययोजनांपासून वंचित आहेत. २०१६ पासून दररोज ८०० स्त्रिया बाळाला जन्म देताना मरण पावतात. आजही एक चतुर्थांश महिला आपल्या जोडीदारासोबत सेक्स करण्यास नकार देऊ शकत नाहीत.आजही,लैंगिक संबंध ठेवणाऱ्या १० पैकी १ महिला गर्भनिरोधक पद्धतींबद्दल स्वतःहून निर्णय घेऊ शकत नाही. अहवालात असे म्हटले आहे की डेटा असलेल्या ४०% देशांमध्ये शारीरिक संबंधांबाबत निर्णय घेण्यात महिला पुरुषांपेक्षा मागे आहेत.

Comments
Add Comment

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय

बिहारला ‘जंगलराज’ पासून वाचवा!

गृहमंत्री शहा आणि नड्डा यांचा बिहारच्या मतदारांना इशारा पाटणा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे

२६/११ आरोपी 'राणा'चे पाकिस्तान कनेक्शन तपासा!

राष्ट्रीय तपास संस्थेकडूनअमेरिकेकडे विशिष्ट माहितीची मागणी; मोठी चौकशी सुरू नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास

बिहार निवडणूक 2025 : फिलोदी सट्टा बाजारानं निवडणुकीच्या निकालाविषयी केलं भाकीत

पाटणा : बिहारमध्ये निवडणुकीचं तापमान चढलं असलं तरी सगळ्यांची नजर आता राजस्थानच्या प्रसिद्ध फिलोदी सट्टा