भारताची लोकसंख्या १४४ कोटींहून जास्त: ७७ वर्षांत दुप्पट

Share

१४ वर्षांपर्यंतची लोकसंख्या सुमारे ३५ कोटी : संयुक्त राष्ट्राचा अहवाल

नवी दिल्ली : युनायटेड नेशन्स हेल्थ एजन्सी युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA) च्या ताज्या अहवालात भारताची लोकसंख्या गेल्या ७७ वर्षांत दुप्पट झाल्याचा दावा करण्यात आला आहे.अहवालानुसार, २००६-२३ दरम्यान भारतात बालविवाह २३ % कमी झाले आहेत, तसेच प्रसूतीदरम्यान महिलांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे.UNFPA च्या स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन २०२४ च्या रिपोर्ट इंटर-वोव्हन लाइव्हज, थ्रेड्स ऑफ होप: एंडिंग इनइक्वलिटी इन लैंगिक आणि प्रजनन आरोग्य आणि अधिकारानुसार, भारताची लोकसंख्या १४४.१७ कोटींवर पोहोचली आहे.या वर्षाच्या सुरुवातीला भारताने सर्वाधिक लोकसंख्येचा देश चीनला मागे टाकले होते, ज्याची लोकसंख्या १४२.५ कोटी आहे. भारत सरकारने २०११ मध्ये केलेली शेवटची जनगणना १२१ कोटी लोकसंख्येची नोंद झाली होती.

अहवालानुसार, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी २४ टक्के लोकसंख्या ०-१४ वर्षे वयोगटातील लोकांची आहे. तर १५-६४ वर्षांची संख्या सर्वाधिक ६४ टक्के आहे. देशातील पुरुषांचे सरासरी वय ७१ वर्षे आहे, तर महिलांचे सरासरी वय ७४ वर्षे आहे. या युनीएफपीएच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, भारतातील लैंगिक आणि प्रजनन आरोग्य ३० वर्षांतील सर्वोत्तम पातळीवर आहे. त्यामुळेच, भारतात प्रसूतीदरम्यान मृत्यू होण्याचे प्रमाणही घटले आहे. जगातील अशा मृत्यूंमध्ये भारताचा वाटा ८ टक्के आहे. त्याच वेळी, २००६-२०२३ दरम्यान झालेल्या एकूण विवाहांपैकी २३ टक्के बालविवाह होते. ज्यामध्ये मुलगा आणि मुलीचे वय २१ आणि १८ वर्षांपेक्षा कमी होते.

या अहवालात जागतिक स्तरावर महिलांच्या लैंगिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली असून, लाखो महिला आणि मुली अजूनही आरोग्याच्या महत्त्वाच्या उपाययोजनांपासून वंचित आहेत. २०१६ पासून दररोज ८०० स्त्रिया बाळाला जन्म देताना मरण पावतात. आजही एक चतुर्थांश महिला आपल्या जोडीदारासोबत सेक्स करण्यास नकार देऊ शकत नाहीत.आजही,लैंगिक संबंध ठेवणाऱ्या १० पैकी १ महिला गर्भनिरोधक पद्धतींबद्दल स्वतःहून निर्णय घेऊ शकत नाही. अहवालात असे म्हटले आहे की डेटा असलेल्या ४०% देशांमध्ये शारीरिक संबंधांबाबत निर्णय घेण्यात महिला पुरुषांपेक्षा मागे आहेत.

Recent Posts

Jio युजर्सला हवे Unlimited 5G डेटा, इतके रुपयांचा करावा लागेल रिचार्ज

मुंबई: जिओने आपला रिचार्ज पोर्टफोलिए अपडेट केला आहे. कंपनीने सर्व प्लान्सच्या किंमतीत बदल केला आहे.…

8 mins ago

IND vs ZIM: अभिषेक-गायकवाडचे वादळ, आवेश-मुकेशचा कहर, झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले

मुंबई: भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले आहे. यासोबतच टीम इंडियाने पाच सामन्यांच्या…

1 hour ago

१००० कोटीहून अधिक नेटवर्थ…क्रिकेटच नव्हे तर बिझनेसमध्येही हिट धोनी

मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. कॅप्टन कूल ४३ वर्षांचा झाला…

2 hours ago

Tomato Price Hike : टोमॅटोची ‘लाली’ आणखी वाढणार

नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…

5 hours ago

Ashadhi Ekadashi : आषाढीमुळे विठुरायाचे व्हीआयपी दर्शन बंद!

दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…

5 hours ago

ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी FSSAI ची नवी नियमावली!

आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…

5 hours ago