️Patanjali : ग्राहकांना फसवणाऱ्या पतंजलीला न्यायालयाने ठोठावला सव्वा लाखाचा दंड

मुंबई : मापात पाप करणाऱ्या बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीविरोधात वजन नियामक विभागाने कारवाई केली असून या प्रकरणात कंपनीला सुमारे सव्वा लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही घटना इंदूर येथील डी-मार्टमध्ये उघडकीला आली आहे.


नोव्हेंबर २०२३ मध्ये महेंद्र जाट नावाच्या ग्राहकाने कनाडिया येथील डी मार्ट या स्टोअरमधून ८०० ग्रॅमचा पतंजलीचा बिस्कीटाचा पुडा खरेदी केला होता. त्यासाठी १२५ रुपयेही मोजले होते. मात्र, शंका आल्याने जाट यांनी संबंधित पुड्याचं वजन केल असता ते कमी असल्याचे दिसून आले. यामुळे कनाडिया यांनी ग्राहक न्यायालयात तक्रार केली.


ग्राहक समिती न्यायालयाने हे प्रकरण वजन नियामक विभागाकडे वर्ग केलं. तपासणीअंती ८०० ग्रॅम असं छापील वजन असणाऱ्या पुड्याचं वजन प्रत्यक्षात ७४६.७० ग्रॅम इतकंच भरलं. पुड्याचं वजन तब्बल ५३ ग्रॅमने कमी भरलं होतं, त्याची किंमत ७ रुपये इतकी होती. त्यानंतर विभागाने पतंजली आणि डी-मार्टला नोटीस बजावली. त्यानंतर पतंजली आणि डी-मार्टने वजन कमी असल्याचं मान्य केलं. त्यामुळे विभागाने पतंजली कंपनीवर एक लाख २० हजार रुपयांचा तर डीमार्टवर २० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

Comments
Add Comment

फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसंग्राम लढणार

मुंबई : मुंबई, ठाणे, भिवंडी आणि नवी मुंबई येथील शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत

पुण्यात राजगुरूनगरमध्ये कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्याचा मित्रावर चाकूने हल्ला; मित्राचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख मिरवणाऱ्या पुण्याची प्रतिमा वाढत्या गुन्हेगारीमुळे मलिन होऊ लागली आहे. ताजी

अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांत 'इलेक्शन'चा धुराळा; निकाल कधी ? वाचा सविस्तर

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यातील २९

खलनायक अक्षय खन्नाच्या भूमिकेचा जलवा, ‘धुरंधर’ने मोडले ‘छावा’-‘पुष्पा २’चे रेकॉर्ड

मुंबई : ‘छावा’ आणि ‘पुष्पा २’नंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवणारा सिनेमा म्हणजे ‘धुरंधर’. आदित्य धर

धक्कादायक! गुंडांनी केला थेट पोलिसांवर हल्ला, मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कांदिवली: मुंबईच्या कांदिवलीमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस