️Patanjali : ग्राहकांना फसवणाऱ्या पतंजलीला न्यायालयाने ठोठावला सव्वा लाखाचा दंड

मुंबई : मापात पाप करणाऱ्या बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीविरोधात वजन नियामक विभागाने कारवाई केली असून या प्रकरणात कंपनीला सुमारे सव्वा लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही घटना इंदूर येथील डी-मार्टमध्ये उघडकीला आली आहे.


नोव्हेंबर २०२३ मध्ये महेंद्र जाट नावाच्या ग्राहकाने कनाडिया येथील डी मार्ट या स्टोअरमधून ८०० ग्रॅमचा पतंजलीचा बिस्कीटाचा पुडा खरेदी केला होता. त्यासाठी १२५ रुपयेही मोजले होते. मात्र, शंका आल्याने जाट यांनी संबंधित पुड्याचं वजन केल असता ते कमी असल्याचे दिसून आले. यामुळे कनाडिया यांनी ग्राहक न्यायालयात तक्रार केली.


ग्राहक समिती न्यायालयाने हे प्रकरण वजन नियामक विभागाकडे वर्ग केलं. तपासणीअंती ८०० ग्रॅम असं छापील वजन असणाऱ्या पुड्याचं वजन प्रत्यक्षात ७४६.७० ग्रॅम इतकंच भरलं. पुड्याचं वजन तब्बल ५३ ग्रॅमने कमी भरलं होतं, त्याची किंमत ७ रुपये इतकी होती. त्यानंतर विभागाने पतंजली आणि डी-मार्टला नोटीस बजावली. त्यानंतर पतंजली आणि डी-मार्टने वजन कमी असल्याचं मान्य केलं. त्यामुळे विभागाने पतंजली कंपनीवर एक लाख २० हजार रुपयांचा तर डीमार्टवर २० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

Comments
Add Comment

दहावी आणि बारावी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी नाव नोंदणी

दहावी आणि बारावी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी नाव नोंदणी मुंबई : फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या माध्यमिक

अभिषेक शर्माने रचला इतिहास, टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५० षटकार ठोकले!

दुबई: आशिया कप २०२५ च्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा ने ऐतिहासिक कामगिरी केली

IND vs PAK: धुलाई झाली तर भडकले पाकचे गोलंदाज, अभिषेक शर्मा-हरिस रौफ यांचा मैदानातच राडा

दुबई: आशिया कप २०२५ च्या सुपर-४ फेरीतील भारत-पाकिस्तान सामन्यात पुन्हा एकदा तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं.

दसरा-दिवाळीत सुक्यामेव्याची खरेदी सर्वसामान्यांना शक्य!

बदाम, पिस्ता, खजूर प्रतिकिलो ४० ते १०० रुपयांनी स्वस्त मुंबई (प्रतिनिधी) : खजूर, बदाम, पिस्ता हे खाण श्रीमंतीचे

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली

सातही धरणांमध्ये वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे भरल्याने

IND vs PAK: कधी सुधारणार पाकिस्तान? हे पाहून तुम्हाला चीड आल्याशिवाय राहणार नाही

दुबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर-४ च्या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा