Chandrapur News : धक्कादायक! चंद्रपूरमध्ये नागरिकांना अन्नातून विषबाधा

दिडशे जण रुग्णालयात दाखल; एकाचा मृत्यु


चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी गावात नागरिकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका धार्मिक कार्यक्रमात आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक भोजनातून आतापर्यंत तब्बल १५० जणांना विषबाधा झाली आहे. सर्व नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विषबाधा झालेल्यांची संख्या वाढत असल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. (Chandrapur Food Poisoning News)


माजरी येथे शनिवारी नवसाची पूजा ठेवण्यात आली होती. यानिमित्त रात्री जेवणाचे आयोजनदेखील करण्यात आले होते. पाचशेहून अधिक लोकांचा या पूजेत सहभाग होता. पूजेनंतर सर्व नागरिकांनी जेवण केले, महाप्रसादाचा लाभ घेतला. जेवण करून कार्यक्रम उरकल्यानंतर सर्व व्यक्ती घरी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास एकामागोमाग अनेक जणांना अचानक त्रास जाणवू लागला. असं पाहता शंभरावर लोकांना विषबाधा झाल्याचे लक्षात आले.


मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दीडशेहून अधिक लोकांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. नंतर हा आकडा वाढतच गेला त्यामुळे हॉस्पीटल देखील कमी पडू लागले. त्यामुळे काही जणांना भद्रावती आणि वरोरा येथे हलवण्यात आले. या सर्व रुग्णांना अन्नातून विषबाधा झाल्याचे कारण समोर आले आहे. सध्या रुग्णांवर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी जेवण ठेवताना अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. या विभागाशी संपर्क साधला असता अन्न व औषध प्रशासन अधिकारी गिरीश सातकर यांनी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट करून चौकशीसाठी जात असल्याचे सांगितले.


दरम्यान, या घटनेत एकाचा मृत्यु झाला आहे. रामप्रेक्ष यादव असे मृत व्यक्तीचं नाव असून रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्च अखेरीस सुरू

पुणे : हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो प्रवास लवकरच मार्च अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. मेट्रो प्रकल्पाने यापूर्वी

मंत्री छगन भुजबळ उद्या नाशिकमध्ये सोबत घेऊन येणार स्व.अजितदादा पवार यांचा अस्थिकलश

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या येवला आणि नाशिकमध्ये सर्व पक्षीय शोक सभेचे आयोजन शोकसभेवेळी

Pune Police Bharti : पुणेकरांसाठी मोठी बातमी! अखेर पोलीस भरतीचे बिगुल वाजले; 'या' तारखेपासून चाचणीला सुरुवात

पुणे : पुणे शहराच्या सीमांचा विस्तार आणि झपाट्याने वाढणारी लोकसंख्या पाहता, पुणे पोलीस दलावर पडणारा ताण कमी

Jayant Patil : अजित दादांची 'ती' इच्छा अधुरीच...राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत जयंत पाटलांचा मोठा खुलासा!

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी

Amravati News : आयआरबीची मलमपट्टी, प्रवाशांच्या जिवाशी खेळ! नांदगाव पेठमध्ये भरवस्तीत उड्डाण पुलाचे काँक्रिट कोसळले

अमरावती : राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पेठ येथे आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या (IRB) निकृष्ट कामाचा नमुना

Sunetra Pawar : मी सुनेत्रा अजित पवार...उद्या राज्याला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री ?

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात मोठी