Sharad Pawar : शरद पवार गटात नाराजीनाट्य; शेकडो कार्यकर्त्यांनी दिला राजीनामा

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांना मोठा धक्का


रावेर : लोकसभा निवडणुका (Loksabha Elections) जवळ आलेल्या असताना महाविकास आघाडीचे जागावाटप झाले असले तरी शरद पवार गटाकडून अद्याप काही जागांवर उमेदवार घोषित करण्यास विलंब होत आहे. याचा ताण असतानाच आता रावेर लोकसभा मतदारसंघात (Raver Lok Sabha Constituency) शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का बसला आहे. रावेर मतदारसंघातून भाजपकडून (BJP) पुन्हा एकदा रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर तगड्या उमेदवाराच्या शोधात शरद पवार गटाने नुकतीच उद्योजक श्रीराम पाटील (Shriram Patil) यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, यामुळे पवारांचे कार्यकर्ते नाराज झाले असून शेकडोंनी राजीनामे दिले जात आहेत.


माजी आमदार संतोष चौधरी हे रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र चौधरी (Santosh Chaudhary) यांना उमेदवारी न देता ऐनवेळी पक्षात आलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याने भुसावळ, वरणगाव, रावेर, यावल या तालुक्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. यामुळे रावेरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. चौधरी यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज आहेत. त्यामुळे ते अपक्ष उमेदवारी दाखल करून बंडखोरी करण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता संतोष चौधरी नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे