Narayan Rane : उद्वव ठाकरेंसारखा माणूस मुख्यमंत्री म्हणुन महाराष्ट्राला लागलेला कलंक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा हल्लाबोल


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाची हॅट्रिक होणार


भाजपा महायुतीच्या चारशे खासदारांमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग खासदार असणारच


मालवण : देशासाठी दिवस रात्र काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव जागतिक स्तरावर होत आहे. त्यांच्या कार्याचे कौतुक अमेरिका व अन्य विकसित राष्ट्रानी केले आहे. विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या आपल्या देशाचा सन्मान सर्व स्तरावर होत असताना चारशेपेक्षा जास्त खासदार विजयी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाची हॅट्रिक पुर्ण होणार. यासोबत रत्नागिरी सिंधुदुर्ग खासदार भाजप महायुतीच्या चारशे खासदारांमधील एक असणार, असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मालवण येथे बोलताना व्यक्त केला.


दरम्यान, उद्धव ठाकरेंकडून (Uddav Thackeray) भाजपवर होत असलेल्या टीकेला कृतीतून उत्तर देणार. उद्धव ठाकरेंसारखा माणूस मुख्यमंत्री म्हणुन महाराष्ट्राला लागलेला कलंक होता, असा जोरदार हल्लाबोल नारायण राणे यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या कंपनीत सगळेच चिटर असल्याचाही टोला त्यांनी यावेळी लगावला.


आडवली मालडी जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्ता मेळावा भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत राठीवडे येथे संपन्न झाला. यावेळी भाजप नेते, मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, भाजप नेते कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका