Shivsena song : 'कणखर बाणा... हाती भगवा... आणि धनुष्यबाण!' शिवसेनेचे नवे प्रचारगीत प्रसिद्ध

गाण्याची सुरुवात बाळासाहेबांपासून, मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन ते मोदीजींची गॅरंटी


मुंबई : "मैं मेरी शिवसेना की काँग्रेस नहीं होने दूँगा... कभी नहीं!" हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांच्या तोंडून हे उद्गार निघतात आणि शिवसेनेचं नवे प्रचारगीत सुरु होतं. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचं नवं गीत (Shivsena new campaign song) प्रदर्शित झालं आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी व महायुतीने (Mahayuti) केलेली विकासकामे दाखवण्यासोबतच उबाठा गटावर (Thackeray Group) टीका करण्यात आली आहे. युट्यूबवर या गाणं सध्या व्हायरल होत असून अनेक जणांनी यावर सकारात्मक कमेंट्स केल्या आहेत.


'कणखर बाणा... हाती भगवा... आणि धनुष्यबाण!' असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यामध्ये बाळासाहेबांचं "मैं मेरी शिवसेना की काँग्रेस नहीं होने दूँगा!" हे वाक्य वारंवार ऐकू येतं. यातून शिवसेनेने उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. यानंतर मुख्यमंत्री शिंदेंच्या 'ही बाळासाहेबांच्या विचारांवर आधारलेली, त्यांचे विचार पुढे नेणारी शिवसेना आहे', या भूमिकेचा गाण्यातून पुनर्रुच्चार केला जातो. गाण्याच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन देण्यात आले आहे.



साडे तीन मिनिटांच्या या गाण्यात नगर विकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी केलेली कामं दिसतात. तसेच मुख्यमंत्री झाल्यानंतर विविध विकास कामांच्या उदघाटनाचे व्हिडिओही दिसतात. व्हिडिओच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही छोटीशी झलक दिसते. “भारताला समृद्ध आणि विकसित बनवायचे आहे”, असे पंतप्रधान मोदी सांगताना दिसतात. शिवसेनेच्या जुन्या प्रचारगीताप्रमाणे हे गाणं नवी ओळख निर्माण करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार