Health: ब्रेकफास्ट, लंच, डिनरची काय आहे योग्य वेळ? घ्या जाणून

मुंबई: ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर हे योग्य वेळेत झाले पाहिजे. तेव्हाच त्याचा संपूर्ण लाभ आपल्या शरीराला मिळतो. आपल्या खाण्याच्या सवयीमध्ये बदल करून तुम्ही आजारांपासून स्वत:चा बचाव करू शकता. आरोग्य तज्ञांच्या मते तुम्ही जर खाण्यापिण्याच्या सवयीत बदल कराल तर लठ्ठपणा, डायबिटीज, पोटाशी संबंधिक अनेक आजारांपासून दूर राहाल. यासाठी प्रत्येकाने दिवसातील तीन वेळा खाण्याच्या वेळेवर अधिक लक्ष दिले पाहिजे.



जेवणाची योग्य वेळ काय आहे?


तज्ञांच्या मते, सकाळचा ब्रेकफास्ट आरोग्यासाठी अतिशय गरजेचा आहे. याचा संपूर्ण फायदा उचलला पाहिजे त्यामुळे सकाळी वेळेत नाश्ता केला पाहिजे. यासाठी योग्य वेळ सकाळी ७ ते ८ इतकी आहे. सकाळी १० नंतर ब्रेकफास्ट करू नये. सकाळी उठल्यावर अर्ध्या तासाच्या आत काही ना काही खाल्लेच पाहिजे.



लंचची योग्य वेळ


दुपारी खाण्याचीही एक वेळ असते. या वेळेनंतर जर लंच केला तर शारिरीक समस्या वाढतात. लंचची योग्य वेळ दुपारी १२.३० ते २ वाजेपर्यंत आहे. यात ब्रेकफास्ट आणि लंच यांच्यात चांगली गॅप मिळते. संध्याकाळई ४ नंतर कधीही जेऊ नये. यामुळे आरोग्यास नुकसान पोहोचते.



रात्रीचे जेवण कधी घ्यावे?


जर तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर रात्रीचे जेवळ संध्याकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत केले पाहिजे. रात्री ९ नंतर जेऊ नये. झोपण्याच्या ३ तास आधी खाल्ले पाहिजे.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे