Ajit Pawar: कोणाला धमकावले असल्यास संबंधितांनी पोलीस केस करावी

अजित पवारांनी दिले शरद पवारांना आव्हान


पुणे : तुम्ही मला गेली कित्येक वर्षे ओळखता. अशा पद्धतीने धमकावण्याच्या गोष्टी केल्या असत्या तर जनतेने मला इतक्या मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलाच नसता, असे करायचे नसते. संस्था चालविताना संस्थेच्या पद्धतीने चालवायची असते व राजकारण करताना राजकारणाच्या पद्धतीने करायचे असते. जर कोणाला धमकावले असल्यास संबंधितांनी पोलीस केस करावी. पोलीस त्याबाबतची चौकशी करुन कार्यवाही करतील, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.


ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता कोणाच्या दमबाजीला घाबरु नका, जे तुम्हाला दम देत आहेत. त्यांना त्या जागेवर कोणी बसवले, हे तुम्हाला अधिक सांगायची गरज नाही, असा टोला लगावला होता. यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी मंगळवारी (दि ९) बारामती दौऱ्यावर पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली.


विजय शिवतारे यांच्या मागण्यांबाबत त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर काही मागण्या केल्या होत्या. त्याचवेळी त्यांनी त्यांच्या भागात त्यांच्या कार्यकर्त्यांचा पुरंदरवासीयांचा मेळावा घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ११ एप्रिल रोजी होणाऱ्या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. आम्ही बोलतो तसे वागतो, आम्ही बदलत नाही.


आज एक बोलायचे, उद्या दुसरे बोलायचे. पुन्हा बोललेलं होऊ द्यायचं नाही, तसे नाही, असा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना टोला लगावत अजित पवार यांनी आम्ही शब्दाला जागून तिघेही जाणार असल्याचे सांगितले.



चांगली गोष्ट, शुभेच्छा उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया


जानाई शिरसई योजनेबाबत आता आपण स्वत: लक्ष घालणार आहोत. ज्यांना अधिकार, जबाबदारी दिली. त्यांनी काम केले नाही. काम कसं होत नाही बघतो, मी ते काम पाहणार असल्याचा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार यांना लगावला होता. या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला अजित पवार यांनी ‘चांगली गोष्ट, शुभेच्छा. या तीन शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. नाशिक, सातारा येथील जागेबाबत महायुतीचे वरिष्ठ बसतील, त्यांनतर तोडगा काढला जाईल. त्यानंतर माध्यमांना माहिती दिली जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.



लोकांना पटेल असे तरी त्यांनी बोलावे


संजय राऊत यांनी लोकसभेची लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे असे नमूद केले आहे. यावर अजित पवार यांनी पत्रकारांनाच तुम्हाला तरी खरंच अस वाटतं का, असे मिश्कीलपणे हसत प्रतिप्रश्न केला. एकवेळ ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे, असे ते म्हणाले असते तर ते मान्य करता आले असते. पण त्यांचा पक्ष महाराष्ट्राबाहेर नाही, त्यामुळे असे होणार नाही. लोकांना पटेल असे तरी त्यांनी बोलावे, असा टोला पवार यांनी राऊत यांना लगावला.

Comments
Add Comment

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध