तिसऱ्यांदा मोदी बनावेत पंतप्रधान...या व्यक्तीने आपले बोट कापून कालिमातेला केले अर्पण

बंगळुरू: कर्नाटकमध्ये एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी पंतप्रधान मोदींसाठी मोठा त्याग केला आहे. त्यांना मोदींचे कट्टर चाहते म्हणून ओळखले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी या व्यक्तीने आपल्या हाताचे बोट कापून कालिमातेला अर्पण केले आहे.


ही घटना शनिवारी समोर आली. कारवार शहरातील सोनारवाडा येथे ही घटना घडली. या व्यक्तीचे नाव अरूण वर्नेकर असे आहे. वर्नेकर यांनी आपल्या घरी पंतप्रधान मोदींचे एक मंदिरही बनवले आहे आणि नियमितपणे ते तेथे पुजा करतात.


आपले बोट कापल्यानंतर त्यांनी आपल्या घराच्या भींतीवर रक्ताने लिहिले की, काली माता मोदी बाबा यांचे रक्षण करा. त्यांनी भींतीवर असेही लिहिले की मोदी बाबा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. तसेच मोदी बाबा सगळ्यात महान असेही लिहिले होते.


मीडियाशी बोलाना अरूण वर्नेकर म्हणाले, पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यानंतर चीन आणि पाकिस्तानमुळे होणारा त्रास कमी झाला आहे. मोदी सत्तेत येण्याआधी काश्मीरमधून दहशतवादी कारवाया तसेच जवानांच्या मृत्यूच्या बातम्या येत होत्या मात्र आता तेथे शांतता प्रस्थापित झाली आहे. देशाच्या विकासाठी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींची गरज आहे.


अरूण वर्नेकर याआधी मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होते. सध्या ते कारवार शहरात राहतात आणि आपल्या वृद्ध आईची काळजी घेतात. ते अविवाहित आहेत. याआधीही २०१९च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी बोट कापण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो यशस्वी झाला नव्हता.

Comments
Add Comment

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने

Rain Alert: दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात पाऊस आणि गारपिटीची शक्यता

नवी दिल्ली: दिल्ली एनसीआरमध्ये शुक्रवारी सकाळी जोरदार वाऱ्यांमुळे हवामान बदलले. हवामान विभागाने संपूर्ण उत्तर

गडबड कराल तर पस्तावाल असा धडा शिकवू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

नवी दिल्ली : आपले शेजारी सध्या अशा स्थितीत आहेत की ते काहीतरी आगळीक करु शकतात. त्यांनी असे केल्यास भारताकडून

राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा झेंडा

नवी दिल्ली : विद्यार्थ्यांच्या कौशल्यधारित संकल्पनांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत