तिसऱ्यांदा मोदी बनावेत पंतप्रधान...या व्यक्तीने आपले बोट कापून कालिमातेला केले अर्पण

बंगळुरू: कर्नाटकमध्ये एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी पंतप्रधान मोदींसाठी मोठा त्याग केला आहे. त्यांना मोदींचे कट्टर चाहते म्हणून ओळखले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी या व्यक्तीने आपल्या हाताचे बोट कापून कालिमातेला अर्पण केले आहे.


ही घटना शनिवारी समोर आली. कारवार शहरातील सोनारवाडा येथे ही घटना घडली. या व्यक्तीचे नाव अरूण वर्नेकर असे आहे. वर्नेकर यांनी आपल्या घरी पंतप्रधान मोदींचे एक मंदिरही बनवले आहे आणि नियमितपणे ते तेथे पुजा करतात.


आपले बोट कापल्यानंतर त्यांनी आपल्या घराच्या भींतीवर रक्ताने लिहिले की, काली माता मोदी बाबा यांचे रक्षण करा. त्यांनी भींतीवर असेही लिहिले की मोदी बाबा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. तसेच मोदी बाबा सगळ्यात महान असेही लिहिले होते.


मीडियाशी बोलाना अरूण वर्नेकर म्हणाले, पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यानंतर चीन आणि पाकिस्तानमुळे होणारा त्रास कमी झाला आहे. मोदी सत्तेत येण्याआधी काश्मीरमधून दहशतवादी कारवाया तसेच जवानांच्या मृत्यूच्या बातम्या येत होत्या मात्र आता तेथे शांतता प्रस्थापित झाली आहे. देशाच्या विकासाठी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींची गरज आहे.


अरूण वर्नेकर याआधी मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होते. सध्या ते कारवार शहरात राहतात आणि आपल्या वृद्ध आईची काळजी घेतात. ते अविवाहित आहेत. याआधीही २०१९च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी बोट कापण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो यशस्वी झाला नव्हता.

Comments
Add Comment

उड्डाणानंतर दिल्ली - मुंबई विमानात बिघाड, इंजिन हवेतच पडलं बंद

नवी दिल्ली : दिल्लीहून मुंबईकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात उड्डाणानंतर अवघ्या ४० मिनिटांत तांत्रिक

"दिपू दासच्या मृत्यूला जबाबदार कोण?" बंगालमधील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कोलकाता : भारतीय राजकारणात पश्चिम बंगाल हे नेहमीच संघर्षाचे केंद्र राहिले आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी

माजी अग्निवीरांना सीमा सुरक्षा दलातील भरतीत ५० टक्के कोटा

मोदी सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली : माजी अग्निवीरांना आता सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) ५० टक्के कोटा निश्चित

विवाह हे केवळ शारीरिक संतुष्टीचे साधन नव्हे...

‘लिव्ह-इन रिलेशनशिप’वर सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्पष्ट मत कोलकाता : "कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक

रेल्वे प्रवासभाड्यात वाढ

२६ डिसेंबरपासून अंमलबजावणी नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार