Thackeray Vs Shinde : ठाकरे गटाला मोठा धक्का! बबनराव घोलप यांचा मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश

  35

उद्यापासून बबनराव गद्दार होतील; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला


मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) केलेल्या बंडाला वर्ष होऊन गेल्यानंतरही शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांचा ओघ कमी व्हायचं नाव घेत नाही. आजवर अनेक कार्यकर्ते, नेते व मंत्र्यांनी ठाकरे गट (Thackeray Group) सोडून शिवसेनेत प्रवेश केला, त्यामुळे शिवसेना अधिकाअधिक बळकट तर ठाकरे गट कमकुवत बनत चालला आहे. त्यातच आज पाच वेळा आमदार राहिलेले माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासह माजी आमदार संजय पवार आणि आरपीआयचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, बबनराव घोलप यांनी आम्हाला तिकडचे काही अनुभव सांगितले. आमचेही तसेच काही अनुभव होते. आता त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांवर निष्ठा दाखवून आमच्याबरोबर येण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांनी स्वतःसाठी काहीही न मागता, त्यांच्या समाजाला न्याय देण्याची भूमिका बोलून दाखवली. त्यांनी याअगोदरच निर्णय घ्यायला हवा होता. पण उशीरा का होईना, त्यांनी योग्य निर्णय घेतला.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोलप यांचे स्वागत करत असताना उबाठा गटावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “बबनराव घोलप आमच्यात आल्यामुळे उद्यापासून त्यांना कचरा असे संबोधले जाईल. त्यांना गद्दर म्हटले जाईल.” मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर सर्व उपस्थितांमध्ये हशा पिकला.



मिलिंद नार्वेकरांचं ऐकून मला बाहेर काढलं : बबनराव घोलप


दरम्यान, बबनराव घोलप यांनी ठाकरे गट सोडत असताना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर टीका केली. “मिलिंद नार्वेकर कोण आहेत? त्यांचे ऐकून मला पक्षातून बाहेर काढले. नार्वेकरांमुळे अनेकजण पक्ष सोडून गेले आहेत. मी शिर्डी लोकसभा मतदारसंघात पक्ष वाढवला. मात्र मिलिंद नार्वेकर यांचे ऐकून मला अचानक बाजूला सारण्यात आले. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि वारसा घेऊन पुढे जात आहेत. यापुढे त्यांच्याबरोबर मी काम करणार आहे. जर त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, तर त्यांनाही सोडेन”, अशी प्रतिक्रिया बबनराव घोलप यांनी दिली.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित