Sangli News : काँग्रेसमुळे ठाकरे गट अडचणीत; तर संजय राऊत भाजपा नेत्याच्या भेटीला

सांगलीच्या जागेवरुन मविआत नेमकं चाललंय काय?


सांगली : सांगलीच्या (Sangli) जागेवरून महाविकास आघाडीत (MVA) सध्या चांगलीच बिघाडी झाली आहे. या जागेवरुन चर्चा सुरु असताना ठाकरे गटाने (Thackeray Group) मात्र एका जाहीर सभेत थेट चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेस (Congress) नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाकरे गट आघाडीचा धर्म पाळत नाही, अशी टीकाही करण्यात आली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने देखील काँग्रेसच्या या भूमिकेला पाठिंबा दिला. त्यामुळे सांगलीच्या जागेवरुन ठाकरे गट चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप (Vilasrao Jagtap) यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीमागे नेमकं काय कारण असावं याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


सांगलीच्या जागेवर तडजोड करण्यास ठाकरे गट तयार नाही, तर ही जागा सोडण्यास काँग्रेसही तयार नाही. सांगलीच्या जागेचा मुद्दा काँग्रेसने दिल्लीच्या नेत्यांकडे मांडला आहे. ही जागा काँग्रेसला न मिळाल्यास आम्ही चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे ठाकरे गटाची कोंडी होण्याची शक्यता आहे. यातच संजय राऊत भाजपा नेत्याच्या भेटीला गेल्याने मविआमध्ये नेमकं काय चाललंय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


भाजपाने सांगली येथून संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त करत विरोध केला आहे. याच विलासराव जगताप यांची जत येथे जाऊन संजय राऊतांनी भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, ही बाब अद्याप गुलदस्त्यात आहे.


काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या भूमिकेमुळे ठाकरे गटाची चांगलीच पंचाईत झाली आहे. असे असतानाच संजय राऊत यांनी भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांची भेट घेतली. या भेटीचा नेमक उद्देश काय होता? सांगली जिल्ह्याचा तिढा सोडवण्यासाठी ही भेट झाली का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार