Sangli News : काँग्रेसमुळे ठाकरे गट अडचणीत; तर संजय राऊत भाजपा नेत्याच्या भेटीला

  81

सांगलीच्या जागेवरुन मविआत नेमकं चाललंय काय?


सांगली : सांगलीच्या (Sangli) जागेवरून महाविकास आघाडीत (MVA) सध्या चांगलीच बिघाडी झाली आहे. या जागेवरुन चर्चा सुरु असताना ठाकरे गटाने (Thackeray Group) मात्र एका जाहीर सभेत थेट चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेस (Congress) नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाकरे गट आघाडीचा धर्म पाळत नाही, अशी टीकाही करण्यात आली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने देखील काँग्रेसच्या या भूमिकेला पाठिंबा दिला. त्यामुळे सांगलीच्या जागेवरुन ठाकरे गट चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप (Vilasrao Jagtap) यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीमागे नेमकं काय कारण असावं याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


सांगलीच्या जागेवर तडजोड करण्यास ठाकरे गट तयार नाही, तर ही जागा सोडण्यास काँग्रेसही तयार नाही. सांगलीच्या जागेचा मुद्दा काँग्रेसने दिल्लीच्या नेत्यांकडे मांडला आहे. ही जागा काँग्रेसला न मिळाल्यास आम्ही चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे ठाकरे गटाची कोंडी होण्याची शक्यता आहे. यातच संजय राऊत भाजपा नेत्याच्या भेटीला गेल्याने मविआमध्ये नेमकं काय चाललंय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


भाजपाने सांगली येथून संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त करत विरोध केला आहे. याच विलासराव जगताप यांची जत येथे जाऊन संजय राऊतांनी भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, ही बाब अद्याप गुलदस्त्यात आहे.


काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या भूमिकेमुळे ठाकरे गटाची चांगलीच पंचाईत झाली आहे. असे असतानाच संजय राऊत यांनी भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांची भेट घेतली. या भेटीचा नेमक उद्देश काय होता? सांगली जिल्ह्याचा तिढा सोडवण्यासाठी ही भेट झाली का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Comments
Add Comment

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून