Sangli News : काँग्रेसमुळे ठाकरे गट अडचणीत; तर संजय राऊत भाजपा नेत्याच्या भेटीला

Share

सांगलीच्या जागेवरुन मविआत नेमकं चाललंय काय?

सांगली : सांगलीच्या (Sangli) जागेवरून महाविकास आघाडीत (MVA) सध्या चांगलीच बिघाडी झाली आहे. या जागेवरुन चर्चा सुरु असताना ठाकरे गटाने (Thackeray Group) मात्र एका जाहीर सभेत थेट चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेस (Congress) नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाकरे गट आघाडीचा धर्म पाळत नाही, अशी टीकाही करण्यात आली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने देखील काँग्रेसच्या या भूमिकेला पाठिंबा दिला. त्यामुळे सांगलीच्या जागेवरुन ठाकरे गट चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप (Vilasrao Jagtap) यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीमागे नेमकं काय कारण असावं याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सांगलीच्या जागेवर तडजोड करण्यास ठाकरे गट तयार नाही, तर ही जागा सोडण्यास काँग्रेसही तयार नाही. सांगलीच्या जागेचा मुद्दा काँग्रेसने दिल्लीच्या नेत्यांकडे मांडला आहे. ही जागा काँग्रेसला न मिळाल्यास आम्ही चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे ठाकरे गटाची कोंडी होण्याची शक्यता आहे. यातच संजय राऊत भाजपा नेत्याच्या भेटीला गेल्याने मविआमध्ये नेमकं काय चाललंय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भाजपाने सांगली येथून संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त करत विरोध केला आहे. याच विलासराव जगताप यांची जत येथे जाऊन संजय राऊतांनी भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, ही बाब अद्याप गुलदस्त्यात आहे.

काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या भूमिकेमुळे ठाकरे गटाची चांगलीच पंचाईत झाली आहे. असे असतानाच संजय राऊत यांनी भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांची भेट घेतली. या भेटीचा नेमक उद्देश काय होता? सांगली जिल्ह्याचा तिढा सोडवण्यासाठी ही भेट झाली का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Recent Posts

Team india: बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचे बक्षीस

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…

1 hour ago

Indian player: विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंसाठी शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…

2 hours ago

Shubh: शुभ काम करण्याआधी का खातात दही-साखर, हे खरंच शुभ असतं का?

मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…

2 hours ago

नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर १२ वर्षानंतर कार्यान्वीत

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…

2 hours ago

Video: मरीन ड्राईव्हवर गर्दीत अडकली अ‍ॅम्ब्युलन्स, चाहत्यांनी असा दिला रस्ता

मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…

4 hours ago

Team India Victory Parade: टी-२० चॅम्पियन्सचे मुंबईत ग्रँड वेलकम, मरिन ड्राईव्हवर चाहत्यांची गर्दी

मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…

4 hours ago