Nitesh Rane : संजय राऊतचा सांगली दौरा प्रचारासाठी नव्हे तर १०० कोटींच्या वसुलीसाठी!

काय आहे वसुली प्रकरण? भाजपा आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट


मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज सांगलीच्या (Sangli) दौर्‍यावर आहेत. महाविकास आघाडीमध्ये (MVA) सांगलीच्या जागेवरुन आधीच धुसफूस सुरु आहे. शरद पवार गट (Sharad Pawar Group) व काँग्रेसचं (Congress) मत विचारात न घेता ठाकरे गटाने चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना सागंलीतून उमेदवारी दिली. त्यांच्याच प्रचारासाठी आणि गाठीभेटी घेण्यासाठी संजय राऊत आज सांगलीमध्ये गेले आहेत, असं चित्र ठाकरे गटाकडून (Thackeray Group) भासवण्यात येत आहे. मात्र, याबाबत भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. संजय राऊत सांगलीमध्ये नेमकं कशासाठी गेले आहेत, यासंबंधी नितेश राणे यांनी मोठा खुलासा केला आहे.


नितेश राणे म्हणाले, पुण्यातील एका काँग्रेसच्या नेत्याचा मला आज सकाळी फोन आला. त्याने दिलेल्या माहितीनुसार, सांगलीच्या लोकसभेसाठी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी आम्ही मागे घेतो पण आम्हाला १०० कोटी द्या, असा प्रस्ताव मातोश्रीवरुन ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावाचा दबाव टाकण्यासाठी, काँग्रेसला झुकवण्यासाठी आज संजय राऊतचा दौरा सांगलीमध्ये चालू आहे, असा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला.


सांगलीच्या उबाठा कार्यकर्त्यांना वाटत असेल की संजय राऊत आमच्यासाठी आले आहेत, चंद्रहार पाटलांना वाटत असेल की भांडुपचा देवानंद माझ्यासाठी सांगलीमध्ये आला आहे, पण खरं तर जो व्यवहार उद्धव ठाकरे करण्याचा प्रयत्न करतायत त्यासाठी संजय राऊत गेला आहे. ही माहिती खरी की खोटी याची माहिती संजय राऊत किंवा त्याच्या मालकाने द्यावी. काँग्रेस कुठल्याही परिस्थितीत अशा कोणत्याही मागणीला होकार देणार नाही म्हणून त्यांच्यावर जास्त दबाव टाकला जात आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला.



निवडणूक म्हणजे ठाकरे कंपनीसाठी फक्त धंदा


निवडणुकीचा संपूर्ण प्रवास पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे आणि कंपनीसाठी फक्त व्यवहार आणि धंदा राहिलेला आहे. विधानसभा, लोकसभेचे तिकीट विकायचे आणि स्वतःचं घर चालवायचं हा उद्धव ठाकरेचा जो जुना धंदा आहे, त्या धंद्याचाच भाग म्हणजे संजय राऊतचा आजचा सांगली दौरा, अशी टीका नितेश राणे यांनी केली.



महाविकास आघाडी वसुलीखोर


संजय राऊतने आज पत्रकार परिषदेत थेट कबुलीच दिली आहे की जे वसुली करायचे त्यांना भाजपने घेतलं आहे. म्हणजे संजय राऊतने महाराष्ट्र आणि देशासमोर स्पष्ट कबुली दिली की महाविकास आघाडीत वसुली व्हायची. मविआचे नेते वसुली करायचे यावर त्याने शिक्कामोर्तब केलं आहे. हे वसुली सरकार असल्याचा आम्ही जो वारंवार आरोप करतो त्याला आज संजय राऊतने कबुली दिली, असं नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार