Navneet Rana : नवनीत राणा यांना दिलासा! सुप्रीम कोर्टाने जात प्रमाणपत्र ठरवलं वैध

  171

निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा


अमरावती : भाजपाच्या अमरावतीतील (Amravati) उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांची उमेदवारी एका कारणास्तव अडचणीत आली होती. नवनीत राणा यांच्या अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र (Caste certificate) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) बोगस ठरवले होते. या निकालाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल करण्यात आली. याबाबत आता अपडेट समोर आली आहे. राणा यांचं जात प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टाने वैध ठरवलं आहे, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीतील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत.


काँग्रेसच्या रामटेकमधील उमेदवार रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांची उमेदवारी याच कारणास्तव नाकारली गेली होती. मात्र, नवनीत राणा यांना याबाबत दिलासा मिळाला आहे आणि त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवनीत राणा भाजपच्या कमळावर अमरावतीतून खासदारकीची निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. त्यांनी आज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आज त्या उमेदवारी अर्ज देखील भरणार आहेत.


२०१९ ला नवनीत राणा अपक्ष खासदार होत्या. आता त्या भाजपच्या उमेदवार आहेत. राणा यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर पहिल्यांदा अमरावतीमधून निवडणूक लढवली आणि शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि अडसूळ यांचा पराभव केला.


गेल्या महिन्यात, सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. ८ जून २०२१ रोजी उच्च न्यायालयाने सांगितले की, 'मोची' जात प्रमाणपत्र बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक करून मिळवले गेले. त्यामुळे राणा यांना २ लाखांचा दंडही ठोठावला होता. मात्र, सुप्रीम कोर्टाने हे प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय दिला आहे.

Comments
Add Comment

Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना मुंबई: मराठी सिनेमांना

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

पुण्यात भीषण अपघात: रक्षाबंधनाच्या आधीच बहीण-भावाची ताटातूट, तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यामध्ये एका धक्कादायक अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय मंजूर

मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.