IPL 2024 : ऐनवेळी आयपीएलच्या दोन सामन्यांच्या तारखांची अदलाबदल

का घेण्यात आला हा निर्णय?


मुंबई : क्रिकेटविश्वात सध्या आयपीएलची (IPL 2024) जोरदार चर्चा आहे. आयपीएलच्या १७ व्या हंगामात आतापर्यंत १४ सामने खेळवले गेले आहेत. प्रत्येक सामना रंगत असतानाच आयपीएलकडून आता मोठी अपडेट देण्यात आली आहे. ऐनवेळी आयपीएलच्या दोन सामन्यांच्या तारखांची अदलाबदल करण्यात आली आहे. राजस्थान आणि कोलकाता, गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे. आयपीएलच्या अधिकृत अकाऊंटवरुन ट्वीट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे.


ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) यांच्यातील सामना १६ एप्रिल रोजी कोलकाता येथे ईडन गार्डन मैदानावर होणार आहे. याआधी हा सामना १७ एप्रिल रोजी होणार होता. तर १६ एप्रिल रोजी होणारा गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामना १७ एप्रिल रोजी होणार आहे. गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.





सामन्याची वेळ बदलण्याचं कारण काय?


१७ एप्रिल रोजी देशभरात रामनवमी (Ramnavami) उत्साहात साजरी केली जाणार आहे. अशा स्थितीमध्ये सुरक्षा पुरवणं शक्य होणार नाही. पश्चिम बंगाल क्रिकेट असोशिएशनसोबत याबाबत बीसीसीआयचं (BCCI) बोलणंही झालं आहे. त्यामुळेच कोलकात्याचा १७ एप्रिल रोजी होणारा सामना आता १६ एप्रिल रोजी होणार आहे. तर १६ एप्रिल रोजी होणारा गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामना १७ एप्रिल रोजी पार पडणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सामन्याचा दिवस बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला