IPL 2024 : ऐनवेळी आयपीएलच्या दोन सामन्यांच्या तारखांची अदलाबदल

का घेण्यात आला हा निर्णय?


मुंबई : क्रिकेटविश्वात सध्या आयपीएलची (IPL 2024) जोरदार चर्चा आहे. आयपीएलच्या १७ व्या हंगामात आतापर्यंत १४ सामने खेळवले गेले आहेत. प्रत्येक सामना रंगत असतानाच आयपीएलकडून आता मोठी अपडेट देण्यात आली आहे. ऐनवेळी आयपीएलच्या दोन सामन्यांच्या तारखांची अदलाबदल करण्यात आली आहे. राजस्थान आणि कोलकाता, गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे. आयपीएलच्या अधिकृत अकाऊंटवरुन ट्वीट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे.


ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) यांच्यातील सामना १६ एप्रिल रोजी कोलकाता येथे ईडन गार्डन मैदानावर होणार आहे. याआधी हा सामना १७ एप्रिल रोजी होणार होता. तर १६ एप्रिल रोजी होणारा गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामना १७ एप्रिल रोजी होणार आहे. गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.





सामन्याची वेळ बदलण्याचं कारण काय?


१७ एप्रिल रोजी देशभरात रामनवमी (Ramnavami) उत्साहात साजरी केली जाणार आहे. अशा स्थितीमध्ये सुरक्षा पुरवणं शक्य होणार नाही. पश्चिम बंगाल क्रिकेट असोशिएशनसोबत याबाबत बीसीसीआयचं (BCCI) बोलणंही झालं आहे. त्यामुळेच कोलकात्याचा १७ एप्रिल रोजी होणारा सामना आता १६ एप्रिल रोजी होणार आहे. तर १६ एप्रिल रोजी होणारा गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामना १७ एप्रिल रोजी पार पडणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सामन्याचा दिवस बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या