खैरणे एमआयडीसीतील तीन कंपन्या जळून खाक

  98

अग्निशमन दलाच्या जवानांनी ८ तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आणली आग


नवी मुंबई(प्रतिनिधी) : एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये आग लागण्याचे सत्र सुरूच असून मंगळवारी सकाळी खैरणे औद्योगिक वसाहतीतील नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीला आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये नवभारत इंडस्ट्रियल कंपनीसह तीन कंपन्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नसली तरी तीन्ही कंपन्यांमधील लाखो रुपये किंमतीचा माल जळून खाक झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी २० ते २५ बंबाच्या सहाय्याने सायंकाळी ६ च्या सुमारास येथील आग आटोक्यात आणली. सदर आगीमागचे कारण स्पष्ट झाले नसले तरी शॉट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.


मंगळवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास खैरणे औद्योगिक वसाहतीतील नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीमध्ये भिषण आग लागली. सुदैवाने कंपनीतील कामगारांनी वेळीच बाहेर पळ काढला. या आगीची भीषणता इतकी प्रचंड होती की आगीमुळे संपुर्ण परिसरात मोठयाप्रमाणात धुराची काळी चादर पसरली होती. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र कंपनीत असलेल्या रसायनामुळे सदर आग नवभारत नवभारत इंडस्ट्रियल कंपनीच्या लगत असलेल्या गोयंका फुड्स आणि जास्मीन ऑटो प्रिंटर्स या दोन कंपन्यांमध्ये पसरली. त्यानंतर आगीचे रौद्र रुप पाहून त्याठिकाणी नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.


त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी २० ते २५ बंबाच्या सहाय्याने शर्थीचे प्रयत्न करत सायंकाळी 6वाजपर्यंत येथील आग आटोक्यात आणली. त्यानंतर या ठिकाणी सायंकाळी उशीरापर्यंत कुलींगचे काम सुरु होते. सुदैवाने या आगीत कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नसली तरी या आगीत तीन्ही कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे या आगीत तीन्ही कंपन्यांचे मोठÎा प्रमाणात नुकसान झाले आहे. तिन्ही कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी आगीचा धोका लक्षात घेऊन वेळीच कंपनीतून बाहेर पळ काढल्याने जीवितहानी टळली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनास्थळी तुर्भे पोलिसांसह वाहतूक पोलीस दाखल झाले होते.

Comments
Add Comment

सासरचा मान घटस्फोटापर्यंत मिळणे हा प्रत्येक पत्नीचा अधिकार, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा

मुंबई (प्रतिनिधी) : पत्नी जर सासरी ऐशारामात राहिली असली तरी तिला तशाच प्रकारचे राहणीमान सासर सोडल्यानंतर

आषाढीनिमित्त मध्य रेल्वे तीन एकेरी विशेष गाड्या चालवणार

मुंबई (प्रतिनिधी): पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी मध्य

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यातील काही भागात आजपासून चार दिवस जोरदार पाऊस बरसणार असल्याचं भारतीय हवामान खात्याच्या मुंबई

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा घेतला आढावा मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Pratap Sarnaik : वाहतूक व्यवसायकांना फायदा होणार ! ई-चलन समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी, परिवहन मंत्र्यांचे आदेश...

मुंबई : गेले अनेक वर्षापासून वाहतूक व्यावसायकांना ई-चलन संदर्भात अडचणींचा सामना करावा लागतोय, ही बाब सरकारच्या