Ramdas Athawale: रामदास आठवलेंना पुन्हा मिळणार राज्यसभेवर संधी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिल्याची माहिती


मुंबई : शिर्डीतून लोकसभा लढवण्याची माझी इच्छा होती. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले, पण यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अडचण झाली, असे केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी सांगितली.


राज्यसभेचा माझा कार्यकाळ २०२६ मध्ये संपेल. त्यानंतर मला पुन्हा संधी देण्यात येईल, असे फडणवीसांनी सांगितले आहे. सध्या रिपाइंकडे केंद्रात राज्यमंत्रीपद आहे. तुम्हाला कॅबिनेट मंत्रीपद मिळावे, यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासन फडणवीसांनी दिले आहे. राज्यात विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर एक मंत्रीपद, विधान परिषदेची आमदारकी दिली जाईल. दोन महामंडळांचे चेअरमनपद, सदस्यपद, जिल्हा तालुक्याच्या कमिट्या, एसईओमध्ये आरपीआयला प्राधान्य देण्यात येईल, असे आठवले म्हणाले.


‘सरकार आपल्या दारी’सारख्या कार्यक्रमांमध्ये तिन्ही पक्षांचे झेंडे असतात. पण रिपाईंचा झेंडा नसतो. याबद्दल आपण फडणवीसांकडे नाराजी बोलून दाखवल्याचेही त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडे एक जागा मागितली होती. शिर्डीतून लोकसभा लढवण्यास मी उत्सुक होतो. शिर्डीमधून मी २००९ मध्ये लढलो होतो. मला शिर्डीतून उमेदवारी मिळावी यासाठी फडणवीस यांनी प्रयत्न केले. पण या मतदारसंघात शिवसेनेचा खासदार असल्याने शिंदेंची अडचण झाली. लोकसभेला तुम्हालाच तिकीट देण्यात येईल, असे आश्वासन शिंदेंनी त्यांच्या सोबत आलेल्या खासदारांना आधीच दिले होते. त्यामुळे मला शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकली नाही, असे आठवले म्हणाले.


रामदास आठवले यांना राज्यसभेवर पुन्हा पाठविण्याविषयी फडणवीसांनी आश्वासन दिल्याचे आठवले सांगत असले तरी आठवलेंच्या रिपाइंला लोकसभेकरिता एकही मतदारसंघ सोडण्यात आलेला नाही. दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने उमेदवार उभे कल्याने रिपाइं मतदार वंचितकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



सत्तेवर असताना विकास न केल्याचा मविआला टोला


प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने महाविकास आघाडीसोबत न जाता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरही आठवलेंनी भाष्य केले. वंचितचा निर्णय योग्यच आहे. मविआमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीला सत्ता असताना विकास करता आला नाही, ते महाविकास काय करणार, असा टोलाही त्यांनी लगावला.

Comments
Add Comment

Maharashtra Monsoon Trip : मान्सून ट्रिप करायची? महाराष्ट्रातील या ८ निसर्गरम्य ठिकाणांना नक्की भेट द्या!

पावसाळ्याची पहिली सर, सर्वत्र मातीचा सुगंध आणि हिरवागार निसर्गाच्या सानिध्यात पावसाळ्यात एक वेगळीच मजा

Kidambi Srikanth : किदांबी श्रीकांतच्या खिलाडूवृत्तीने जिंकली प्रेक्षकांची मने

कॅलिफोर्निया(California) : भारताचा माजी जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने(Kidambi Srikanth)

Voter List Update : मतदारयादी पुनरीक्षणाला वेग; ३० जूनपासून बीएलओंची घरभेट

रायगड : भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार रायगड जिल्ह्यात 'विशेष सखोल पुनरीक्षण २०२६' (SIR) मोहीम

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या राशीनुसार नेसा 'या' शुभ रंगांची साडी

मुंबई : विवाहित महिलांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जाणारा वटपौर्णिमेचा सण आता अवघ्या काही तासांवर

Vat Purnima 2026: यंदाची वटपौर्णिमा ठरणार खास; सोमवारी दुर्मिळ शुभ संयोग, जाणून घ्या पूजेचा मुहूर्त

यंदा वटपौर्णिमा (Vat Purnima 2026) २९ जून २०२६ रोजी साजरी केली जाणार असून या वर्षीचा सण धार्मिकदृष्ट्या विशेष मानला जात आहे.

Soccer Ball : फुटबॉल इतिहासातील ५ अजरामर बॉल; ज्यांनी बदलली खेळाची दिशा!

फुटबॉलच्या मैदानावर खेळाडूंचे कौशल्य जितके महत्त्वाचे असते, तितकेच महत्त्वाचे असते तो 'बॉल'. तंत्रज्ञान आणि