Icecream: आईस्क्रीम खाल्ल्यानंतर चुकूनही करू नका या गोष्टींचे सेवन, नाहीतर आरोग्याला होईल हे नुकसान

मुंबई: उन्हाळा येताच लोक थंड पदार्थ खाण्यास सुरूवात करतात. उन्हाळ्याच्या दिवसांत कोल्ड्रिंक, फ्रूट ज्यूस, लस्सी, शिकंजी, श्रीखंड तसेच आईस्क्रीम हे खाण्याला मोठी पसंती असते. अधिकतर लोक तर आईस्क्रीम खाणे पसंत करतात.


मात्र तुम्हाला माहीत आहे की आईस्क्रीम खाल्ल्यानंतर काही गोष्टींचे सेवन चुकूनही करू नये. जाणून घ्या आईस्क्रीम खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टींचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत आईस्क्रीम खाणे अधिक पसंत करतात. मात्र हे खाल्ल्यानंतर लगेचच काही गोष्टींचे सेवन करू नये.


आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेचच थंड पाणी पिऊ नये. असे केल्याने पोटदुखी, गॅस, अॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते.


याशिवाय तुम्ही आईस्क्रीम खाल्ल्यानंतर गरम पदार्थांचे सेवन करू नये. जसे चहा, कॉफी, सूप, ग्रीन टी इत्यादी. इतकंच नव्हे तर आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेचच संत्री, लिंबूपाणी, द्राक्षे या फळांचे सेवन करू नये. हे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.


आईस्क्रीम खाल्ल्यानंतर चुकूनही दारूचे सेवन करू नये. यामुळे उल्टीचा त्रास, पोटातील त्रास तसेच चक्कर येणे या समस्या सतावू शकतात. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर भोजनही करू नये जसे मटन, बटर, तुपात बनवलेले पदार्थ, बिर्याणी, चायनीज पदार्थ, जंक फूड खाऊ नयेत.


याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरजेपेक्षा अधिक आईस्क्रीमचे सेवन करू नये. कारण यामुळे शरीरास नुकसान होते. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर कमीत कमी ४० मिनिटांपर्यंत काही खाऊ नये.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे